AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठ संशयितांपैकी ७ बांगलादेशी नागरिक, पाकसाठी करत होते रेकी, लष्करचे टेरर मॉड्युल उद्धवस्थ

संशयित आरोपींच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता त्यात अनेक संवेदनशील स्थळांचे व्हिडिओ सापडले आहेत, ज्यामुळे ते शस्त्रे गोळा करीत होते आणि संभाव्य हल्ल्यांची तयारी करीत होते असे पोलिस तपासात उघड झाले आहे.

आठ संशयितांपैकी ७ बांगलादेशी नागरिक, पाकसाठी करत होते रेकी, लष्करचे टेरर मॉड्युल उद्धवस्थ
DELHI POLICE
| Updated on: Feb 23, 2026 | 8:06 PM
Share

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लष्कर-ए-तैयबाने एका मोठ्या अतिरेकी मॉड्युलचे भंडाफोड करीत दिल्ली, कोलकाता आणि तामिळनाडूतून एक ८ संशयितांना अटक केली आहे. स्पेशल सेलचे अधिकाऱ्यांच्या मते हे मॉड्युल पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय आणि बांगलादेश अतिरेकी संघटनांच्या इशाऱ्यावर अतिरेकी हल्ल्याची योजना आखत होते. ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून १२ हून अधिक मोबाईल फोन आणि १६ सिमकार्ड जप्त केले आहेत.

या आरोपींना सोशल मीडियावर पाकिस्तानच्या अतिरेकी संघटनांच्या समर्थनार्थ एक पोस्ट टाकण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रमोद कुशवाहा यांनी सांगितले की ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली आणि कोलकाता मेट्रो स्थानकावर पोस्टर्स लावण्यात आले होते, त्यात बुरहान वाणी आणि पाकिस्तानी अतिरेकी संघटनाच्या कारवायांचे समर्थन केले होते. तपासात असे उघडकीस आले की पोस्टर्स लावणारे लोक कोलकातातून दिल्लीत आले होते. ७ फेब्रुवारीला दिल्ली आणि १० फेब्रुवारीला कोलकातात पोस्टर्स लागली होती.

या प्रकरणात कोलकाताहून २ आणि तामिळनाडू येथून सहा आरोपींना अटक झाली. तामिळनाडूच्या तिरुप्पुर येथून सहा आरोपींना अटक झाली त्यात मिझानुर, मोहम्मद शबात, उमर, मोहम्मद लिटन, मोहम्मद शाहीद आणि मोहम्मद उज्ज्वल यांचा समावेश आहे. हे सर्व तिरुप्पुरच्या गारमेंट इंडस्ट्रीत काम करत होते. आणि ओळख लपवण्यासाठी खोट्या आधारकार्डांचा वापर करत होते. अटक केलेल्या आठ संशयितात ७ बांगलादेशी नागरिक आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडूत अटक केलेल्या सहा संशयितांवर अतिरेक्यांच्या मदतीसाठी भारताच्या विविध महत्वांच्या स्थळांची रेकी केल्याचा आरोप आहे.

अतिरेकी मॉड्युलचा बेस बनवला

या अतिरेकी मॉड्युलचा हँडलर शब्बीर अहमद लोन उर्फ शब्बीर शाह असून त्याने पाकिस्तानातून प्रशिक्षण घेतलेले आहे. सध्या तो बांगलादेशातून आपले नेटवर्क हाताळत आहे. शब्बीर याला साल २००७ मध्ये दिल्लीतून अटक झाली होती, जेव्हा तो एका मोठ्या नेत्याची आत्मघातकी हल्ल्यात हत्या करण्यासाठी आला होता. त्याच्याकडून एके -४७ आणि हँडग्रेनेड जप्त करण्यात आले होते. २०१७-१८ मध्ये शिक्षा भोगल्यानंतर तो पुन्हा देशाबाहेर पळाला आणि त्यानंतर तो लष्कर-ए-तैयब्बाच्या संपर्कात आला. त्याने कोलकातात त्याने महागडा फ्लॅट भाड्याने घेऊन अतिरेकी मॉड्युलचा बेस बनवला होता.

Follow Us
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी