Andhra Pradesh Accident : लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, आंध्र प्रदेशमध्ये कार-लॉरी अपघातात 8 ठार

| Updated on: Feb 07, 2022 | 12:55 AM

लग्नाहून परतत असताना अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावरील कोटलापल्ली भागात समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या लॉरीने त्यांच्या कारला भीषण टक्कर दिली. अपघात इतका भीषण होता की यात कारमधील नऊ जण जागीच ठार झाले असून गाडीचा चेंदामेंदा झालाय.

Andhra Pradesh Accident : लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, आंध्र प्रदेशमध्ये कार-लॉरी अपघातात 8 ठार
लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, आंध्र प्रदेशमध्ये कार-लॉरी अपघातात 9 ठार
Follow us on

आंध्र प्रदेश : भरधाव वेगात आलेली लॉरी(Lorry)ने कारला टक्कर मारल्याने कार(Car)मधील 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आंध्र प्रदेशातील अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावरील कोटलापल्ली भागात जिल्ह्यात घडली आहे. मृतांमध्ये 6 महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. सर्व मयत उरवाकोंडा येथील रहिवासी असून कर्नाटक राज्यातील बेल्लारी येथे लग्नासाठी गेले होते. लग्नाहून आपल्या गावी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. याप्रकरणी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उरवाकोंडा पोलीस करत आहेत. अपघातातील मृतांची अद्याप ओळख पटली नसून पोलीस मृतांची ओळख पटविण्याचे काम करत आहेत. (9 killed in Andhra Pradesh car and lorry crash)

लग्नाहून परतताना भीषण अपघात

टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार कर्नाटकातील बेल्लारी येथे एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी उरवाकोंडा येथील एक कुटुंब आपल्या इनोव्हा कारने गेले होते. लग्नाहून परतत असताना अनंतपुरम-बेल्लारी राष्ट्रीय महामार्गावरील कोटलापल्ली भागात समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या लॉरीने त्यांच्या कारला भीषण टक्कर दिली. अपघात इतका भीषण होता की यात कारमधील नऊ जण जागीच ठार झाले असून गाडीचा चेंदामेंदा झालाय. या घटनेमुळे उरवाकोंडा गावावर शोककळा पसरली आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

आंध्र प्रदेशमध्ये अपघाताचे सत्र सुरुच

आंध्र प्रदेशमध्ये 14 जानेवारी रोजी पश्चिम गोदावरी जिल्ह्यात असाच भीषण अपघात घडला होता. या अपघाता चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर 10 जण जखमी झाले होते. मासे घेऊन जाणारा ट्रक नियंत्रण सुटल्याने राष्ट्रीय महामार्ग 216 वरील ताडेपल्लीगुडेम मंडलातील कोंद्रुप्रोलू येथे उलटला. यात ट्रकमधील चार मजुरांचा मृत्यू झाला तर 10 मजूर जखमी झाले. हा ट्रक विशाखापट्टणम जिल्ह्यातील दुव्वाडा येथून पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील उंगतुरु मंडलातील नारायणपूरला जात होता. (9 killed in Andhra Pradesh car and lorry crash)

इतर बातम्या

Amaravati Drown : अमरावतीत घोंशी धरणात तीन जण बुडाले, मायलेकींचा मृत्यू तर पतीला वाचवण्यात यश

तीन मुलांच्या आईचा फेसबुक मित्रावर जीव जडला, मग पैशासाठी प्रियकराचा अमानुष छळ केला, वाचा नेमके प्रकरण काय ?