AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amaravati Drown : अमरावतीत घोंशी धरणात तीन जण बुडाले, मायलेकींचा मृत्यू तर पतीला वाचवण्यात यश

गौरव आणि प्रिया यांचा चार वर्षापूर्वीच विवाह झाला होता. दोघांना एक तीन वर्षाची मुलगी आहे. गौरव आणि प्रिया यांचे वैवाहिक जीवन फारसे चांगले नव्हते. दोघांमध्ये नेहमी कौटुंबिक वाद होत होते. मात्र वादाचे नेमके कारण समजू शकले नाही.

Amaravati Drown : अमरावतीत घोंशी धरणात तीन जण बुडाले, मायलेकींचा मृत्यू तर पतीला वाचवण्यात यश
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Feb 06, 2022 | 11:20 PM
Share

अमरावती : दर्यापूर तालुक्यातील घोंशी धरणात(Ghonshi Dam) बुडून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अमरावतीत घडली आहे. प्रिया गौरव तायडे(24) (Priya Gaurav Tayade) असे मयत महिलेचे नाव आहे. तर प्रियाचा पती गौरव तायडे याला वाचवण्यास बचाव पथकाला यश आले आहे. गौरव, प्रिया आणि त्यांची 3 वर्षाची मुलगी तिघेही धरणाजवळून जात असताना पाय घसरुन धरणात पडले. धरणावरील सुरक्षारक्षकाने ही घटना पाहिल्यानंतर त्याने तात्काळ तेथील भोई समाजातील लोकांना याची माहिती दिली. भोई समाजाच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव गौरव तायडे सुखरुप बाहेर काढले. मात्र प्रिया आणि 3 वर्षाच्या चिमुरडीचा बुडून मृत्यू झाला. बचाव पथकाने दोघींचेही मृतदेह बाहेर काढले. मात्र प्रियाच्या माहेरच्या लोकांनी गौरवने मारण्याच्या उद्देशाने पत्नी आणि मुलीला पाण्याच ढकलले असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सध्या अपघाताची मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करीत आहेत. (Mother and daughter drown in Ghonshi dam in Amravati)

पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरु होते

गौरव आणि प्रिया यांचा चार वर्षापूर्वीच विवाह झाला होता. दोघांना एक तीन वर्षाची मुलगी आहे. गौरव आणि प्रिया यांचे वैवाहिक जीवन फारसे चांगले नव्हते. दोघांमध्ये नेहमी कौटुंबिक वाद होत होते. मात्र वादाचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनेच्या दिवशी हे तिघेही नातेवाईकांच्या घरुन धामोडी पारद येथे आपल्या घरी परतत होते. मात्र ते दर्यापूर तालुक्यातील घोंशी धरणावर गेले. तेथे त्यांचा पाय घसरुन ते धरणात पडले. याप्रकरणी प्रियाच्या नातेवाईकांनी मात्र हा घातपात असल्याचे म्हटले आहे. याबाबत पोलीस प्रियाचा पती गौरव आणि प्रत्यक्षर्शी सुरक्षारक्षक यांची सखोल चौकशी करीत आहेत. पोलीस तपासानंतरच सत्य काय ते कळेल.

अचलपूरमध्ये बेपत्ता अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला

अचलपूर तालुक्यातील बोर्डी गावातील बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह आज एका शेतातील विहिरीत आढळून आला. वेदांत सुरेश तट्टे असे मयत मुलाचे नाव असून तो इयत्ता दहावीत शिकत होता. वेदांत हा 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता घरातून निघून गेला तो पुन्हा घरी परतलाच नाही. घरच्यांनी आजूबाजूला जाऊन पाहिले असता कुठे दिसला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र वेदांतचा थांगपत्ता लागत नव्हता. आज दुपारी एका शेतात ओलितासाठी गेलेल्या मजुराला दुर्गंधी येऊ लागल्याने त्याने विहिरीत डोकावून पाहिले असता वेदांतचा मृतदेह दिसला. त्याने तात्काळ याची माहिती गावकरी आणि पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलीस ही हत्या आहे, आत्महत्या की अपघात ? याचा तपास करीत आहेत. (Mother and daughter drown in Ghonshi dam in Amravati)

इतर बातम्या

तीन मुलांच्या आईचा फेसबुक मित्रावर जीव जडला, मग पैशासाठी प्रियकराचा अमानुष छळ केला, वाचा नेमके प्रकरण काय ?

Gondia Accident | लग्नाची तारीख ठरवून गावी निघाले, पण वाटेतच होत्याचं नव्हतं झालं! तिघे ठार

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली