AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 कोटीचे दान आणि 5 देशांच्या हिमालयीन बोर्डाचा प्रस्ताव, नेपाळ संकटानंतर सद्गुरुंचे मोठे पाऊल

'नेपाळ सोबत एकजूठ' या कार्यक्रमाचा भाग म्हणून, काठमांडूमधील लोकांनी आपत्तीग्रस्तांच्या समर्थनार्थ रॅली काढल्या. तात्काळ मदतीच्या पलीकडे जाऊन, सद्गुरूंनी हिमालयाप्रती अधिक सखोल सामूहिक जबाबदारीचे आवाहन केले. ते म्हणाले की, पर्वत राष्ट्रीय सीमांच्या पलीकडे आहेत आणि त्यांचे भविष्य त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सर्वांशी जोडलेले आहे.

1 कोटीचे दान आणि 5 देशांच्या हिमालयीन बोर्डाचा प्रस्ताव, नेपाळ संकटानंतर सद्गुरुंचे मोठे पाऊल
Sadhguru Jaggi Vasudev and Nepal crisis
| Updated on: Aug 31, 2026 | 8:25 PM
Share

नेपाळ येथे आलेल्या भीषण आणि विनाशकारी पुरानंतर इशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव पहिल्यांदा सार्वजनिक रुपात समोर आले आहे. रविवारी काठमांडूत ‘नेपाळ सोबत एकजूट’ कार्यक्रमात त्यांनी नेपाळचे पंतप्रधान मदत निधी फंडात 1  कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले की हिमालयाच्या जवळ राहणाऱ्या देशांनी मिळून या नैसर्गिक संकटाचा सामना करायला हवा.

या पुराने आतापर्यंत ९०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक बेपत्ता आहे. बेपत्ता लोकांमध्ये ईशाच्या कैलास यात्रेचे ७७ सदस्य देखील आहेत. ते अपघाताच्या वेळी चीनच्या बाजूने गियिरोंग इमिग्रेशन सेंटरवर होते. तसेच नेपाळच्या हद्दीतील तीन ईशाचे स्वयंसेवक बेपत्ता आहे. सद्गुरुंनी सल्ला दिला आहे की भारत, चीन, पाकिस्तान, नेपाल आणि भूतान यांनी मिळून एक हिमालयीन बोर्ड स्थापन करायला हवे.

हिमालय पृथ्वीचे सर्वात सुंदर ठिकाण – सद्गुरु

ते म्हणाले की या देशांनी आपल्या मर्यादेच्या वर उठून हिमालयाशी संबंधित असलेल्या समस्यांचा मिळून निपटारा केला पाहिजे. सद्गुरु म्हणाले की पर्वतांना तुमच्या राजकीय विचाराधारेशी काय संबंध नाही. त्यांना या गोष्टीची परवा नाही की तुम्ही कोणती भाषा बोलत आहात. भले आप यास एक साथ न चालवू शकलो तर किमान एक साथ बसून सल्ला -मसलत केली पाहिजे. आपल्या कामात ताळमेळ असायला हवा. कारण हिमालय पृथ्वीवर सर्वात सुंदर आणि भव्य वस्तू आहे.तसेच हा भाग नाजूकही आहे.

ते म्हणाले की एक अशी संस्था बनवली पाहिजेत ज्यात सर्व देशांनी सामील व्हावे ज्या देशात हिमालयाचे पर्वत पसरले आहेत. भलेही प्रत्येक देशाचे स्वतंत्र प्रशासन असो. पण या पर्वतांना भावी पिढ्यांसाठी जतन करण्यासारखी गोष्ट म्हणून ओळखले पाहिजे. जर आपण हे केले नाही आणि ही केवळ नेपाळची समस्या आहे आणि त्यांनीच ती हाताळावी असा विचार करत राहिलो, तर यावर कधीच तोडगा निघणार नाही.

 सद्गुरु यावेळी काय म्हणाले ?

ते म्हणाले की या संकटाचा परिणाम अपेक्षेपेक्षा कितीतरी पट मोठा होता. याचा निपटारा सर्वांनी करायला हवा. केवल नेपाळ याचा सांभाळ करु शकत नाही. कोणी विचारही केला नव्हता की ग्लेशियरचा तीन चतृर्थांश हिस्सा डोंगराच्या कड्यावरुन ४००० फूट खाली कोसळेल. अशा घटनेचा कोणताही अंदाज नव्हता. परंतू आता हे झाले आहे तर भविष्यात यावर लक्ष द्यावे लागेल.कारण नेपाळसारखा एखादा छोटा देश यास एकट्याने निपटारा करु शकणार नाही.

मनीषा कोईराला हीने सद्गुरुंना केला प्रश्न –

सद्गुरु यांच्या सोबत व्यासपीठावर बसलेली अभिनेत्री मनीषा कोइराला हीने त्यांना विचारले की एवढ्या मोठ्या हानीतून काय शिकू शकतो. त्यावर उत्तर देताना त्यांनी केवळ नुकत्याच झालेल्या अपघाताचा उल्लेख केला नाही तर हे देखील सांगितले की माणासांचे जीवन किती नाजूक आहे.

संकटे येण्याची वाट पाहू नये – सद्गुरु

सद्गुरु म्हणाले की, मानव म्हणून आपण संकटे येण्याची वाट पाहू नये. माणूस म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपण प्रत्येक क्षणी नश्वर आहोत हे समजून घेणे. जर आपण याबद्दल सतत जागरूक राहिलो, तर आपण आपल्या जीवनाचे नियोजन करून ते अत्यंत समंजसपणे जगू शकू. त्यांनी लोकांना संकटांना “दैवी कारणे” किंवा “गूढ शक्यता” न मानण्याचे आवाहनही केले. ते म्हणाले की, अशा दृष्टिकोनांमुळे मानवी दुःखाचे वास्तव कमी लेखले जाऊ शकते. त्यांनी जीवनातील आध्यात्मिक पैलू आणि नैसर्गिक घटनांवर नियंत्रण ठेवणारे भौतिक नियम यांमधील फरक समजून घेण्याच्या गरजेवर भर दिला.

Follow Us
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या दिवंगत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख...
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख... 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...