AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INS विराटवर राजीव गांधींसोबत हजर असलेले अॅडमिरल एल. रामदास काय म्हणाले?

रायगड : ‘INS विराट’ या ऐतिहासिक युद्धनौकेचा वापर दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी सहलीसाठी केला, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा पूर्णपणे खोटा असून, त्यात काहीही तथ्य नाही, असे निवृत्त अॅडमिरल एल. रामदास यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाव्याची पोलखोलच माजी अॅडमिरल एल. रामदास यांनी केली आहे. कारण मोदींनी ज्या प्रसंगाचा उल्लेख राजीव […]

INS विराटवर राजीव गांधींसोबत हजर असलेले अॅडमिरल एल. रामदास काय म्हणाले?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM
Share

रायगड : ‘INS विराट’ या ऐतिहासिक युद्धनौकेचा वापर दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी सहलीसाठी केला, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा पूर्णपणे खोटा असून, त्यात काहीही तथ्य नाही, असे निवृत्त अॅडमिरल एल. रामदास यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाव्याची पोलखोलच माजी अॅडमिरल एल. रामदास यांनी केली आहे. कारण मोदींनी ज्या प्रसंगाचा उल्लेख राजीव गांधी यांच्यावर टीका करण्यासाठी केला आहे, त्यावेळी INS विराटवर राजीव गांधींसोबत अॅडमिरल एल. रामदास हेही हजर होते.

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी सुट्टीसाठी INS विराटवर गेले होते, ही गोष्ट पूर्णपणे चूक आणि खोटी आहे, असे सांगत अॅडमिरल एल. रामदास पुढे म्हणाले, “आम्ही त्रिवेंद्रम येथून राजीव गांधी यांना सोबत घेतले. राजीव गांधी हे नॅशनल अॅथलेटिक्सचे प्रमुख होते. लक्षद्विप येथे खेळाचे कार्यक्रम होते, त्यासाठी ते तिथे आले होते. दोन दिवस ते तिथे होते. नंतर निघून गेले. यावेळी राजीव गांधी आयलँड फिरले. कारण ते आयलँड डेव्हलपमेंटचे अध्यक्ष होते. त्यासाठी त्यांनी तिथे मिटिंगही आयोजित केली होती. मात्र, त्याआधी आयलँड फिरुन त्यांनी माहिती घेतली. त्यामुळे राजीव गांधी हे वैयक्तिक सहलीसाठी आयलँडवर आले होते, हे खोटे आहे.”

“राजीव गांधी ज्यावेळी INS विराटवर आले, त्यावेळी मी साऊथर्न नवल कमांडचा फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ होतो. INS विराटवर कुठल्याही प्रकराची पार्टी झाली नाही.” असे अॅडमिरल एल. रामदास यांनी स्पष्ट केले.

वाचा : खरंच ‘INS विराट’चा राजीव गांधींनी टॅक्सीसारखा वापर केला होता?

“सैन्याचा वापर राजकीय मुद्द्यांसाठी करणं पूर्णपणे चूक आहे. नाहीतर उद्या तुम्ही सैन्याचे सुद्धा खासगीकरण कराल. सैन्य कुणाचीही खासगी गोष्ट नाहीय. आम्ही नागरी प्रशासनाचे निश्चितच आदर करतो, मात्र याचा अर्थ असा नाही की, आम्ही त्यांची हुजरेगिरी करु. आम्ही (सैन्य) देशाचे आहोत आणि देशाचेच राहू.”, असेही अॅडमिरल एल. रामदास म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी (8 मे) पुन्हा एकदा गांधी कुटुंबावर हल्ला चढवला. 1987 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधींनी 10 दिवसांच्या सहलीसाठी बेटावर जाताना आयएनएस विराट या युद्धजहाजाचा टॅक्सीप्रमाणे उपयोग केल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींनी आरोप करताना सहलीच्या ठिकाणाचा मात्र उल्लेख केला नाही. त्यानंतर राजीव गांधींची ही सहल नेमकी कोणत्या बेटावर झाली होती याबद्दल उत्सुकता वाढताना दिसत आहे.

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.