AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agnipath Scheme Protest : सैन्याच्या तिनही दलात आता केवळ ‘अग्निपथ योजनेद्वारे’च भरती! लष्कर, नौदल आणि वायू सेनेकडून स्पष्ट

आता देशाच्या तिन्ही सैन्य दलात रेग्युलर भरती प्रक्रिया होणार नाही. आता सैन्य भरती ही केवळ अग्निपथ योजनेद्वारेच होईल, असं लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी सांगितलंय. लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आलीय.

Agnipath Scheme Protest : सैन्याच्या तिनही दलात आता केवळ 'अग्निपथ योजनेद्वारे'च भरती! लष्कर, नौदल आणि वायू सेनेकडून स्पष्ट
भारतीय सैन्य दलImage Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Updated on: Jun 19, 2022 | 4:08 PM
Share

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेबाबत (Agnipath Scheme) अत्यंत मोठी बातमी समोर आलीय. आता देशाच्या तिन्ही सैन्य दलात रेग्युलर भरती प्रक्रिया होणार नाही. आता सैन्य भरती (Military recruitment) ही केवळ अग्निपथ योजनेद्वारेच होईल, असं लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी सांगितलंय. लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत (Press Conference) ही माहिती देण्यात आलीय. वायू सेनेसाठी 24 जून, नौसेने साठी 25 जून तर लष्करासाठी 1 जुलैपासून भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. सैन्याला युवकांची गरज आहे. आज जवानांचं सरासरी वय 32 आहे. ते कमी करुन आपल्याला 26 वर आणायचं आहे. युवक जास्त धोका पत्करु शकतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 1989 मध्येच या योजनेवर विचार सुरु करण्यात आला होता. ही योजना लागू करण्यापूर्वी अनेक देशाची सेन्य भरती आणि एक्झिट प्लॅनचा अभ्यास केल्याची माहितीही लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी दिली आहे.

कधी होणार भरती प्रक्रियेला सुरुवात?

लेफ्टनंट जनरेल बन्शी पुनप्पा यांनी सांगिलं की 1 जुलैपासून अग्निवीरांच्या भरतीसाठी नोटीफिकेशन जारी केलं जाईल. त्यानंतर इच्छुक उमेदवार अर्झ करु शकतात. भरतीसाठी पहिली प्रक्रिया ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होईल. यावेळी फिजिकल टेस्ट आणि मेडिकल होईल. त्यानंतर एन्ट्रन्स परीक्षा होईल. या परीक्षेनंतर मेरिटनुसार उमेदवारांना वेगवेगळ्या जागी पाठवलं जाईल. ऑगस्टपासून नोव्हेंबरपर्यंत दोन टप्प्यात भरती प्रक्रिया होईल. पहिल्या टप्प्यात 25 हजार अग्निवीरांची भरती केली जाईल. अग्निवीरांचा दुसरा टप्पा फेब्रुवारीत येईल. अग्निवीरांच्या भरतीसाठी देशात 83 ठिकाणी प्रक्रिया पार पडेल. वायू सेना 24 जून पासून अग्निवीरांची भरती सुरु करेल. तर नौदलाची भरती प्रक्रियेचं 25 जूनपासून जारी केलं जाईल.

पुरुष आणि महिलांची भरती प्रक्रिया होणार

रविवारी सैन्य दलाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत नौदल अधिकाऱ्यांनी सांगितलं की अग्निपत योजनेत पुरुष आणि महिला अशा दोघांचीही भरती प्रक्रिया केली जाईल. अग्निवीरांची पहिली बॅच नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संस्थांना रिपोर्ट करेल, असंही यावेळी सांगण्यात आलं.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ