AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहुमतचाचणी आधी बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग, लालूंनी सर्व आमदारांना आपल्या घरीच थांबवले

Bihar Politics : बिहारच्या राजकारणात सध्या जोरदार हालचाली सुरु आहेत. नितीशकुमार यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. बिहारमध्ये १२ फेब्रुवारी रोजी बहुमत चाचणी होणार आहे. त्याआधी लालू यादव हे देखील अॅक्टिव्ह झाले आहे. आमदार फुटू नये म्हणून त्यांनी एकाच ठिकाणी सगळ्यांना ठेवले आहे.

बहुमतचाचणी आधी बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग, लालूंनी सर्व आमदारांना आपल्या घरीच थांबवले
| Updated on: Feb 10, 2024 | 8:28 PM
Share

पाटणा : बिहारच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव सक्रिय झाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडीसोबतची साथ सोडून पुन्हा एकदा भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. आता त्यांच्या नव्या सरकारची बहुमतचाचणी पार पडणार आहे. त्याआधी राजकीय घडामोडी सुरु झाल्या आहेत. लालू यादव यांनी आरजेडीच्या सर्व आमदारांना तेजस्वी यादव यांच्या शासकीय निवासस्थानी थांबवले आहे. आमदारांच्या वस्तू त्यांच्या घरुन मागवण्यात आले आहेत.

बहुमतचाचणी कधी होणार?

बिहारमध्ये १२ फेब्रुवारीला फ्लोर टेस्ट होणार आहे. जेडीयूने 11 फेब्रुवारीला विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. यात जेडीयूच्या सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. बिहारमधील काँग्रेसच्या आमदारांना हैदराबादला पाठवण्यात आले आहे. आमदार फुटू नये म्हणून काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

जीतनराम मांझीही चर्चेत

फ्लोअर टेस्टच्या आधी बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हिंदुस्थान अवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांना आणखी एक मंत्रीपद हवे आहे. त्यांना आरजेडीकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर सगळा खेळ असणार आहे. फ्लोर टेस्टपूर्वी त्यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, ते गरीब आहेत पण धोकेबाज नाही.

कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत?

विधानसभेच्या जागा: 243

आरजेडी: ७९ आमदार काँग्रेस : १९ आमदार CPI(M-L)+CPI+CPI(M): १६ आमदार

विरोधकांकडे एकूण संख्याबळ : ११४ आमदार AIMIM : १

नितीश कुमार यांच्याकडे किती आमदार

भारतीय जनता पक्षाचे ७८

जनता दल युनायटेडचे ​​४५

हिंदुस्थान अवाम मोर्चा  ४

अपक्ष आमदार १

एकूण आमदार १२८

इंडिया आघाडीला धक्का

भाजपने लोकसभा निवडणुकीआधी एनडीएमधील जुन्या सहकारी मित्र पक्षांना पुन्हा एकदा जवळ करण्याची तयारी सुरु केली आहे. प्रत्येक राज्यातील प्रादेशिक पक्षांना आपल्या सोबत घेण्यासाठी भाजपने एक कमिटी स्थापन केली आहे. त्यामुळे विरोधक ही चिंतेत आहे. कारण नितीश कुमार यांनी सोबत घेऊन त्यांनी इंडिया आघाडीला पहिली सुरुंग लावला आहे.

दुसरीकडे काँग्रेसला भीती आहे की, भाजप त्यांच्या आमदारांना देखील फोडू शकते. त्यामुळे काँग्रेसने 14 आमदारांना तेलंगणामध्ये हलवले आहे.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.