AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझ्या बॅगेत बॉम्ब…’, Air India च्या प्रवाशाला विमानतळावर अटक, काय आहे प्रकरण?

Air India: प्रवासी म्हणाला 'माझ्या बॅगेत बॉम्ब...', भारतातील 'या' विमानतळावर माजली सर्वत्र खळबळ... नक्की काय आहे प्रकरण? घ्या जाणून, सध्या सर्वत्र प्रकरणाची चर्चा...

'माझ्या बॅगेत बॉम्ब...', Air India च्या प्रवाशाला विमानतळावर अटक, काय आहे प्रकरण?
| Updated on: Aug 11, 2024 | 2:47 PM
Share

विमानतळावरुन कायम चांगल्या किंवा धक्कादायक बातम्या समोर येत असतात. आता देखील विमानतळावरील एक मोठी माहिती समोर येत आहे. एअर इंडियाच्या (Air India ) एका प्रवाशाला कोची विमानतळावर अटक करण्यात आली. मनोज कुमार असे या प्रवाशाचे नाव आहे. मनोज कुमार यांना एअर इंडियाच्या विमानाने (AI 682) कोचीहून मुंबईला जायचं होतं. एक्स-रे बॅगेज इन्स्पेक्शन सिस्टीम चेकपॉईंटवर तपासणी करत असताना मनोजने सीआयएसएफ अधिकाऱ्याला विचारले, माझ्या बॅगेत बॉम्ब आहे का? मनोजच्या या वक्तव्यामुळे तिथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांचा तणाव वाढला आणि विमानतळावर एकच खळबळ माजली…

कोची विमानतळाने या प्रकरणाची संपूर्ण माहिती देणारं निवेदन जारी केलं आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार, सुरक्षा तपासणीदरम्यान मनोज कुमार यांनी सीआयएसएफ अधिकाऱ्याला विचारले, माझ्या बॅगेत बॉम्ब आहे का? या विधानामुळे चिंता निर्माण झाली आणि विमानतळ सुरक्षा पथकाने त्वरित कारवाई करण्यास सुरुवाक केली. अधिकाऱ्यांनी तात्काळ बॉम्ब शोधक आणि निकामी पथक (BDDS) बोलावलं.

बीडीडीएसने प्रवाशांच्या केबिनची तपासणी करून त्याच्या संपूर्ण सामानाची देखील तपासणी केली. आवश्यक तपास केल्यानंतर पोलिसांनी प्रवाशी मनोज कुमार याला पुढील तपासासाठी स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि एअर इंडियाचे विमान ठरल्याप्रमाणे निघाले.

सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये बॉम्बची धमकी, विमानतळावर बॉम्बच्या अफवा यासारख्या बातम्या रोज येत असतात. या बातम्यांमुळे विमानतळावर खळबळ माजते आणि प्रवाशांच्या मनात भीती निर्माण होते. अशात अधिकांऱ्यांवरील तणाव देखील वाढतो.

काही दिवसांपूर्वी ‘इंडिगो’च्या विमात बॉम्ब असल्याची सुचना मिळाली होती. त्यामुळे विमात असलेल्या प्रवाशांमध्ये खळबळ माजली… याच कारणामुळे संपूर्ण विमान रिक्त करण्यात आला. विमान लखनऊहून अबुधाबीला जाणार होते. विमानाच्या टॉयलेटजवळ कोणीतरी बॉम्ब लिहून ठेवलं होतं.

टॉयलेटजवळ बॉम्ब लिहिल्याची माहिती मिळताच केबिन क्रूने एटीसीला माहिती दिली. विमान तातडीनं रिकामं करण्यात आलं. अखेर तपास केल्यानंतर बॉम्ब असल्याची फक्त अफवा असल्याची माहिती समोर आली… अशा घटना कायम घडत असतात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.