AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर अमित शाहांचं मोठं विधान, ते गुपित आलं समोर

जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यावरून निर्माण झालेल्या वादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी धनखड यांच्या आरोग्याच्या समस्या राजीनाम्यामागील कारण असल्याचे सांगितले. विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या शंकांना शाह यांनी फेटाळून लावले.

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर अमित शाहांचं मोठं विधान, ते गुपित आलं समोर
| Updated on: Aug 25, 2025 | 4:12 PM
Share

जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला होता. विरोधकांनी या राजीनाम्यामागे इतर काही कारणे असल्याचा आरोप केला होता. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अखेर मौन सोडले आहे. जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला, त्या मागचे कारण काय, याबद्दल सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.

अमित शाह यांनी नुकतंच एएनआयला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनामा देण्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर अमित शाहांनी खरे कारण सांगितले. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचे कारण त्यांच्या आरोग्याच्या समस्या असल्याचे अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. जगदीप धनखड यांनी केवळ त्यांच्या वैयक्तिक आरोग्याच्या कारणांमुळे राजीनामा दिला आहे. या प्रकरणावरून कोणीही राजकारण करू नये.” असे अमित शाह म्हणाले.

अमित शाह काय म्हणाले?

“खरं काय आणि खोटं काय ही व्याख्या कदाचित विरोधक काय बोलत यावरुन तुम्ही बनवलेली आहे. यात उगाचच पराचा कावळा बनवू नये. जगदीप धनखड हे संवैधानिक पदावर होते आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी संविधानानुसार चांगले काम केले. त्यांच्या वैयक्तिक आरोग्याच्या समस्येमुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. कोणीही जास्त ताणून त्यात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू नये. देशात अनेक घटना घडतात, प्रत्येक घटनेमध्ये अशाप्रकारे राजकारण करणे योग्य नाही”, असे अमित शाह म्हणाले.

विरोधक आक्रमक

दरम्यान जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर दिवसभर संसदेच्या कामकाजात भाग घेतला होता. मात्र त्याच संध्याकाळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. या राजीनाम्यामध्ये त्यांनी आरोग्याच्या समस्या आणि डॉक्टरांचा सल्ला ही कारणे दिली होती. तरीही काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी तो एक सामान्य राजीनामा मानण्यास नकार दिला होता. आता अमित शाह यांच्या स्पष्टीकरणामुळे या चर्चेवर पडदा पडण्याची शक्यता आहे.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?