AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘घुसखोर हीच काँग्रेसची व्होटबँक, फोडा आणि राज्य करा अशी त्यांची रणनिती’, अमित शाहांचा घणाघात

काँग्रेसची रणनिती ही इंग्रजांसारखी फोडा आणि राज्य करा, अशी आहे, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला (Amit Shah slams Congress in Assam)

'घुसखोर हीच काँग्रेसची व्होटबँक, फोडा आणि राज्य करा अशी त्यांची रणनिती', अमित शाहांचा घणाघात
| Updated on: Jan 24, 2021 | 6:07 PM
Share

दिसपूर (आसाम) : “काँग्रेस आणि ऑल इंडिया डेमोक्रेटिक फंडचे संस्थापक बदरुद्दीन अजमल हे घुसखोरांसाठी सारे दरवाजे उघडतील. कारण तीच त्यांची व्होटबँक आहे. काँग्रेसची रणनिती ही इंग्रजांसारखी फोडा आणि राज्य करा, अशी आहे”, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. आसामच्या नालबारी येथे विजय संकल्प कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी घुसखोरांना फक्त भाजप सरकार रोखू शकतं, असा दावा केला (Amit Shah slams Congress in Assam).

“जे कित्येक वर्षांपासून इथे सरकारमध्ये आहेत त्यांनी आसामच्या संस्कृतीसाठी काय केलं? असा प्रश्न मला त्यांवा विचारायचा आहे. मतं गोळा करण्या व्यतिरिक्त या लोकांनी आणखी काही केलेलं नाही. एनडीएने आसासमध्ये शंकरदेव यांच्या सन्मानार्थ काही महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत”, असं अमित शाह म्हणाले.

“काँग्रेस अनेकदा भाजपवर सांप्रदायिकतेचा आरोप करते. मात्र, तीच काँग्रेस केरळमध्ये मुस्लीम लीगसोबत आहे तर आसाममध्ये काँग्रेसने बदरुद्दीन अजमलसोबत युती केली आहे. काँग्रेस आसामला कोणत्या दिशेला घेऊन जात आहे?”, असा सवाल त्यांनी केला.

“कलम 370 ला कुणीही हात लावू शकत नव्हतं. मात्र, आम्ही त्याबाबतचा निर्णय करुन दाखवला. प्रभू श्रीरामांचे मंदिर बनवण्याबाबत देशभरातून आवाज उठत होता. काँग्रेस इंग्रजांच्या नितीवर चालत राहिली. लोकांमध्ये फूट पाडा आणि राज्य करा, अशी त्यांची रणनिती आहे. आसाममध्ये इतके दिवस त्यांनी तेच केलं. काँग्रेसने लोकांना आपसात लढवत आसामला रक्तरंजित केलं. यामध्ये 10 हजार पेक्षा जास्त युवकांचं रक्त सांडलं आहे”, असं शाह म्हणाले (Amit Shah slams Congress in Assam).

“आसाममध्ये विकासाची गाडी धावत आहे. नवे रस्ते, रुग्णालये, कॉलेज बनत आहेत. आगामी काळात पूराच्या समस्येवरही भाजप सरकार तोडगा काढेल. आम्ही आसामात शांतता प्रस्थापित केली आहे. आम्हाला पुढचे पाच वर्ष आणखी द्या”, असं आवाहन त्यांनी केलं.

हेही वाचा : काही अदृश्य शक्तीमुळेच शेतकरी आंदोलनावर तोडगा नाही; केंद्रीय कृषी मंत्र्यांचा दावा

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.