AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं, बस कॅनॉलमध्ये पलटी होताना जोराचा आवाज झाला, 35 प्रवाशांनी सांगितलं कारण

Andhra Pradesh Road Accident : आज सकाळी लग्न समारंभासाठी निघालेली एक बस कॅनॉलमध्ये पलटी झाली. त्यामध्ये सात जणांचा जागीचं मृत्यू झाला आहे. ३५ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं, बस कॅनॉलमध्ये पलटी होताना जोराचा आवाज झाला, 35 प्रवाशांनी सांगितलं कारण
Andhra Pradesh Road AccidentImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 11, 2023 | 11:25 AM
Share

मुंबई : लग्नासाठी निघालेल्या एका बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. त्यामध्ये सात लोकांचा जागीचं मृत्यू झाला आहे. झालेल्या अपघातामध्ये १२ जण गंभीर जखमी असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. सात लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एका लहान मुलाचा सुध्दा समावेश आहे. हा अपघात आज सकाळच्या सुमारास तड़के दर्शी परिसरात झाला आहे. बसमधील सगळी लोकं पोडिली काकीनाडा येथे लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी निघाले होते. त्या बसमध्ये ३५ प्रवासी होते. चालकाचं गाडीवरील नियंत्रण बिघडलं, आणि बस कॅनॉलमध्ये पलटी झाली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिस प्रशासन (Andhra Pradesh Police) तिथं दाखल झाले आहे. हा अपघात आंध्रप्रदेश (Andhra Pradesh Road Accident) राज्यातील प्रकाशम जिल्ह्यात झाला आहे.

लग्नात जाण्यासाठी भाड्याने गाडी घेतली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, लग्नात जाण्यासाठी लोकांनी प्रवासासाठी सरकारी मालकीची आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ (APSRTC) बस भाड्याने घेतली होती. गाडी सुरु असताना चालकाला झोप लागली. त्यामुळे हा अपघात झाला आहे. अब्दुल अजीज (65), अब्दुल हानी (60), शेख रमीज (48), मुल्ला नूरजहां (58), मुल्ला जानी बेगम (65), शेख शबीना (35) आणि शेख हिना (6) यांचा मृ्त्यू झाला आहे.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले…

हा अपघात सकाळी झाल्यानंतर आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर जखमी रुग्णांना तातडीने मदत करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील लोकांनी सुध्दा सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केलं आहे.

मृत्यू झालेल्या लोकांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. गंभीर रुग्णांवरती उपचार सुरु आहेत.

जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.
आजचं राजकारण किळसवाणं, घृणास्पद झालंय! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत
आजचं राजकारण किळसवाणं, घृणास्पद झालंय! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत.
विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात? सुनील तटकरेंचा प्रश्न
विलीनीकरण कुठच्या पक्षाचं कुठल्या पक्षात? सुनील तटकरेंचा प्रश्न.
भाजप-राष्ट्रवादीचं सरकार दादांची इच्छा होती! तटकरेंचा मोठा खुलासा
भाजप-राष्ट्रवादीचं सरकार दादांची इच्छा होती! तटकरेंचा मोठा खुलासा.