AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं, बस कॅनॉलमध्ये पलटी होताना जोराचा आवाज झाला, 35 प्रवाशांनी सांगितलं कारण

Andhra Pradesh Road Accident : आज सकाळी लग्न समारंभासाठी निघालेली एक बस कॅनॉलमध्ये पलटी झाली. त्यामध्ये सात जणांचा जागीचं मृत्यू झाला आहे. ३५ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं, बस कॅनॉलमध्ये पलटी होताना जोराचा आवाज झाला, 35 प्रवाशांनी सांगितलं कारण
Andhra Pradesh Road AccidentImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jul 11, 2023 | 11:25 AM
Share

मुंबई : लग्नासाठी निघालेल्या एका बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. त्यामध्ये सात लोकांचा जागीचं मृत्यू झाला आहे. झालेल्या अपघातामध्ये १२ जण गंभीर जखमी असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. सात लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एका लहान मुलाचा सुध्दा समावेश आहे. हा अपघात आज सकाळच्या सुमारास तड़के दर्शी परिसरात झाला आहे. बसमधील सगळी लोकं पोडिली काकीनाडा येथे लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी निघाले होते. त्या बसमध्ये ३५ प्रवासी होते. चालकाचं गाडीवरील नियंत्रण बिघडलं, आणि बस कॅनॉलमध्ये पलटी झाली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिस प्रशासन (Andhra Pradesh Police) तिथं दाखल झाले आहे. हा अपघात आंध्रप्रदेश (Andhra Pradesh Road Accident) राज्यातील प्रकाशम जिल्ह्यात झाला आहे.

लग्नात जाण्यासाठी भाड्याने गाडी घेतली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, लग्नात जाण्यासाठी लोकांनी प्रवासासाठी सरकारी मालकीची आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ (APSRTC) बस भाड्याने घेतली होती. गाडी सुरु असताना चालकाला झोप लागली. त्यामुळे हा अपघात झाला आहे. अब्दुल अजीज (65), अब्दुल हानी (60), शेख रमीज (48), मुल्ला नूरजहां (58), मुल्ला जानी बेगम (65), शेख शबीना (35) आणि शेख हिना (6) यांचा मृ्त्यू झाला आहे.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले…

हा अपघात सकाळी झाल्यानंतर आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर जखमी रुग्णांना तातडीने मदत करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील लोकांनी सुध्दा सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केलं आहे.

मृत्यू झालेल्या लोकांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. गंभीर रुग्णांवरती उपचार सुरु आहेत.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान