AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon : दोन शाखेतून मान्सूनचे आगमन अन् ‘या’ राज्यातून घेतो वरुणराजा निरोप..!

देशात दोन शाखांमधून मान्सूनचे आगमन होत असले तरी याच पावसावर देशभरातील शेती आणि इतर उद्योग अवलंबून आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशभरात पाऊस सुरू होतो. मान्सून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटांवर धडक देतो आणि 1 जून रोजी केरळमध्ये पोहोचतो. बंगालच्या उपसागरातून मॉन्सूनचे वारे पुढे सरकतात आणि हिमालयावर आदळतात आणि उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात परततात.

Monsoon : दोन शाखेतून मान्सूनचे आगमन अन् 'या' राज्यातून घेतो वरुणराजा निरोप..!
पावसाची खबरबातImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 27, 2022 | 6:10 AM
Share

मुंबई : शेती क्षेत्राबरोबरच इतर उद्योग, व्यवसायासाठी जसा (Monsoon) मान्सून महत्वाचा आहे त्याचप्रमाणे त्याचा प्रवासही रंजक आहे. आतापर्यंत आपण मान्सूनचे आगमन, सरासरी किती पाऊस पडणार आणि परतीचा पाऊस केव्हा सुरु होणार इथपर्यंतचेच अंदाज घेत आलेलो आहोत. अनिश्चित व अनियमित स्वरुपाच्या असणाऱ्या मान्सूनचे भारत देशात दोन शाखेतून आगमन होते. त्यामुळे सर्वच ठिकाणी समसमान पाऊस पडेल असे नाही. (Two Branches) बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात हे वारे पोहचल्यानंतर याच्या दोन शाखा निर्माण होतात. एक शाखा अरबी समुद्रामध्ये तर दुसरी शाखा बंगालच्या उपसागरात. त्यामुळे देशातील पर्जन्यमानात मोठा फरक असतो. देशांतर्गत भागात (Himalayan range) हिमालय नसते तर उत्तर भारतातील मैदानी भागात मान्सूनचा पाऊस पडला नसता, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दोन शाखांमधून दाखल होणार असा हा मान्सून

देशात अरबी समुद्रातून दाखल होणारा पाऊस हा मुंबई, गुजरात आणि राज्यस्थानातून मार्गे पुढे जातो तर दुसरी शाखा बंगालच्या उपसागरातून पश्चिम बंगाल, बिहार, ईशान्यमार्गे हिमालयाशी धडकते आणि तसेच ते गंगेच्या प्रदेशाकडे वळते. मान्सूनच्या मार्गात पर्वतरांगा आणि हिमालय असल्याने जागोजागी पाऊस बरसत असला तरी त्यामध्ये एकसमानता नसते हेच मान्सूनचे वेगळेपण आहे. अशाप्रकारे वेगवेगळ्या वळणावर प्रवास करीत जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा पाऊस देशभर सक्रीय होतो.

मान्सूनचा देशात असा प्रवास

देशात दोन शाखांमधून मान्सूनचे आगमन होत असले तरी याच पावसावर देशभरातील शेती आणि इतर उद्योग अवलंबून आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशभरात पाऊस सुरू होतो. मान्सून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटांवर धडक देतो आणि 1 जून रोजी केरळमध्ये पोहोचतो. बंगालच्या उपसागरातून मॉन्सूनचे वारे पुढे सरकतात आणि हिमालयावर आदळतात आणि उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात परततात. भारतात मान्सून जूनपासून सप्टेंबरपर्यंत चार महिने सक्रिय असतो. या 4 महिन्यांत किती पाऊस पडेल याचा अंदाज हवामान खाते अनेक बाबींचा वापर करून वर्तवतो.

राज्यस्थानमध्ये होतो मान्सूनचा शेवट

मान्सूनचे आगमन हे केरळ राज्यातून होत असले तरी शेवट मात्र, वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यस्थानात होतो. देशभर चार महिने पाऊस पडल्यानंतर हंगामाच्या अंतिम टप्प्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस हा राज्यस्थानमध्ये होतो आणि त्यानंतरच भारतातील मानसून हा संपतो. राजस्थान आणि तामिळनाडूच्या काही भागात फक्त 10-15 सेंटीमीटर पाऊस पडतो.

Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.