AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिग्विजय सिंह बोलले; तर काँग्रेस शून्य होणार; म्हणाले…

काँग्रेस अध्यक्ष पदाबाबत बोलताना त्यांनी हेही सांगितले की, अशोक गहलोत यांच्या जागी मी अधिकृत उमेदवार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दिग्विजय सिंह बोलले; तर काँग्रेस शून्य होणार; म्हणाले...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Sep 29, 2022 | 7:42 PM
Share

नवी दिल्लीः दिग्विजय सिंह (Digvijay Singh) आणि वादग्रस्त वक्तव्य हे समीकरण आहे. आताही त्यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत (Congress President Election 2022) वक्तव्य केल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधान आले आहे. दिग्विजय सिंह यांनी अशोक गहलोतांचा वाद टोकाला गेल्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्जही (Application for candidacy) खरेदी केला आहे. त्यामुळे उद्याते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज खरेदी केल्यानंतर आणि अर्ज दाखल करण्याआधीच खासदार दिग्विजय सिंह यांनी नेहरू-गांधी परिवाराशिवाय काँग्रेस शून्य आहे, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

दिग्विजय सिंह यांनी अर्ज दाखल केला नसला तर त्यांच्याबरोबर शशी थरुर यांचेही नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे दिग्विजय सिंह यांच्या या विधानाचा राजकीय विश्लेषकांनी अनेक अर्थ काढले आहेत.

अशोक गहलोत यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, गहलोत हे आमचे अधिकृत उमेदवार असू शकतात असं आतापर्यंत तरी वाटत होते. तरीही ते निवडणुकीत उभा राहिले असले तरी आम्ही त्यांच्याकडे आदरानेच पाहणार असंही त्यांनी सांगितले.

राजस्थानातील राजकीय घडामोडींना वेग आला असला तरी ती तिथेच टाळली गेली पाहिजे होते, ती वाढल्यानेच राजकारणात ही वेगळी समस्या निर्माण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस अध्यक्ष पदाबाबत बोलताना त्यांनी हेही सांगितले की, अशोक गहलोत यांच्या जागी मी अधिकृत उमेदवार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीत उतरण्याचा माझा वैयक्तिक निर्णय असून मी माझ्या स्वतःच्या विवेकबुद्धीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे सांगितले आहे.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार