AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारची शानदार योजना, प्रत्येक महिन्याला मिळेल 5000 रुपयांची पेन्शन, केवळ 210 रुपयांची गुंतवणूक

सरकारच्या अनेक योजना आहे. मात्र, ही योजना असंघटित कामगारांसाठी देखील वरदान आहे. जेवढे लवकर या योजनेत सामील झाले तेवढा मासिक हप्ता कमी होतो. आणि निवृत्तीनंतर 5,000 रुपए मासिक पेन्शन मिळते.

सरकारची शानदार योजना, प्रत्येक महिन्याला मिळेल 5000 रुपयांची पेन्शन, केवळ 210 रुपयांची गुंतवणूक
Senior Citizen
| Updated on: Apr 24, 2026 | 7:25 PM
Share

निवृत्तीची योजना नेहमीच लोक टाळत असतात. मात्र, नंतर म्हातारपणी ही मोठी समस्या बनते. अशात सरकारची अटल पेन्शन योजना ( APY ) त्यांना लोकांसाठी एक सुरक्षित पर्याय आहे, ज्यांना म्हातारपणी नियमित उत्पन्न हवे. खास बाब ही आहे की योजना गॅरंटीड पेन्शन देते आणि यात जोखीम देखील कमी आहे. अटल पेन्शन योजनेत पाच हजार मासिक पेन्शन मिळण्यासाठी गुंतवणूकीची रक्कम वयावर अवलंबून असते. १८ वर्षात २१० रुपये, ३० व्या वर्षी ५७७ रुपये आणि ४० मध्ये १,४५४ रुपये मासिक हप्ता भरावा लागतो. लवकरात लवकर गुंतवणूक सुरु केली तर मासिक हप्त्याची रक्कम कमी होते.

योजनेची लोकप्रियता वाढत आहे

APY योजनेची लोकप्रियतता सतत वाढतच आहे. २१ एप्रिल २०२६ पर्यंत या योजनेत ९ कोटीहून जास्त लोक जोडले गेले आहेत. यामुळे हे स्पष्ट आहे की ही योजना देशातील सामाजिक सुरक्षेचे एक मजबूत साधन होत आहे. खास करुन असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी.

काय आहे अटल पेन्शन योजना ?

ही एक सरकारी पेन्शन स्कीम आहे. जिला पेन्शन फंड रेग्युलेटरी एण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी ( PFRDA ) संचालित करते. यात तुम्ही १,००० रुपयांपासून ५,००० रुपयापर्यंत मासिक पेन्शन निवडू शकता. जी ६० वर्षांच्या वयानंतर मिळते. तुमची गुंतवणूक तुमचे वय आणि निवडलेली पेन्शन यावर अवलंबून असते. प्रत्येक महिन्याला निश्चित रक्कम तुमच्या खात्यातून ऑटो-डिडक्ट होते. ज्यामुळे बचत करणे सोपे होते.

५००० रुपये पेन्शनसाठी किती गुंतवणूक करावी लागेल ?

१८ वर्षाच्या वयात सुरुवात – दर महिन्याला सुमारे २१० रुपये जाम करावे लागतील. ( दीर्घ काळ ( ४२ वर्षे ) मिळाल्याने मासिक हप्त्याचे ओझे कमी.

३० वर्षाच्या वयात सुरुवात – दर महिने ५७७ रुपये जमा करावे लागतील.

४० वर्षाच्या वयात सुरुवात – दर महिन्याला १,४५४ रुपये जमा करावे लागतील ( कारण गुंतवणूकीचा वेळ केवळ २० वर्षांचा मिळतो. )

यात हे स्पष्ट आहे की जेवढे जास्त लवकर सुरुवात करणार तेवढा मासिक हप्ता कमी असणार आहे.

सर्वांना समान पेन्शन

वय काहीही असो, जर तुम्ही ५,००० रुपये पेन्शन निवडली, तर ६० व्या वयानंतर तुम्हाला दर महिन्याला निश्चित रक्कम मिळले. फरक केवळ एकूण गुंतवणूकीत असेल.

कुटुंबाला देखील मिळतो फायदा

या योजनेचा एक मोठा फायदा की पेन्शनर याच्या मृत्यूनंतर जीवनसाथीला देखील पेन्शन मिळत रहाते. दोघांच्या मृत्यूनंतर सुमारे ८.५ लाख रुपयांचा फंड नॉमिनीला मिळतो.

कोण-कोण लाभ घेऊ शकते ?

१८ ते ४० वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक, ज्याच्याकडे बँक वा पोस्ट ऑफीसमध्ये सेव्हींग अकाऊंट असेल तो या योजनेत सामील होऊ शकतो.

लवकर सुरु करणे का गरजेचे आहे ?

अटल पेन्शन योजनेला ( APY ) सर्वात मोठा संदेश हा आहे की ही योजना लवकर सुरु करावी आणि कमी गुंतवणूकीत सुरक्षित भविष्य बनवता येते. उशीर केल्याने दर महिन्यास जास्त पैसे भरावे लागतात. ही योजना त्या लोकांसाठी चांगली आहे ज्यांना कमी जोखीमेत गॅरंटीड पेन्शन हवी. आणि निवृत्तीनंतर जे आत्मनिर्भर राहू इच्छीतात.

Follow Us
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
Buldhana News | पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा, 15 जण जखमी
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई, चक्क 6 लाख...
पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
Pandharpur | पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं आवाहन; देशात मोठ्या उलथापालथी होणार?
पंडित नेहरुंचा कार्यकाळ बारा नाहीतर सोळा वर्षांचा... संजय राऊतांनी
पंडित नेहरुंचा कार्यकाळ 12 नाहीतर 16 वर्षांचा... संजय राऊतांनी मांडलं गणित, काय म्हणाले?
जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; भारत World Cup बाहेर?
FIFA World Cup 2026 | जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; 104 सामन्यांचा रंगणार थरार, पण भारत पुन्हा World Cup बाहेर?
ब्रेक फेल नव्हता! दादर बेस्ट बस अपघातात RTO चा मोठा खुलासा
ब्रेक फेल नव्हता! दादर बेस्ट बस अपघातात RTO चा मोठा खुलासा; नेमकं कारण आलं समोर
मान्सूनचा मुंबईला दगा! 11 जून उलटला, तरी पावसाचा थेंबही नाही
Mumbai Weather | मान्सूनचा मुंबईला दगा! 11 जून उलटला, तरी पावसाचा थेंबही नाही; उकाड्याने मुंबईकर हैराण
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर, चाकणकरांच्या नोटीसला थेट चॅलेन्ज
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
Video | पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?