AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरोधी पक्षांच्या एकजुटीला धक्का देणारी पहिली मोठी बातमी, अरविंद केजरीवाल यांची भूमिका बदलली?

विरोधी पक्षांच्या एकजुटीला धक्का देणारी पहिली मोठी बातमी समोर आली आहे. विरोधी पक्षांची आज पाटण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्रासह देशभरातील दिग्गज नेते उपस्थित होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील या बैठकीत उपस्थित होते. पण या बैठकीनंतर विरोधी पक्षांना अनपेक्षित असणारी बातमी समोर आली आहे.

विरोधी पक्षांच्या एकजुटीला धक्का देणारी पहिली मोठी बातमी, अरविंद केजरीवाल यांची भूमिका बदलली?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 23, 2023 | 9:33 PM
Share

पाटणा : देशाच्या तब्बल 15 विरोधी पक्षांची आज एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी एकत्र येण्याबाबत चर्चा करण्यात आली. आपण सगळे एक आहोत आणि एकत्रितपणे पुढच्या निवडणुका लढवुयात या मतावर सर्वांच एकमत झालं. विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर सर्वांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी सर्वांनी भूमिका मांडली. यावेळी सर्वांनी एकत्रिपणे पुढे जायचं ठरल्याचं सांगितलं. तसेच सर्व पक्षांची पुढच्या महिन्यात शिमल्यात पुन्हा एक बैठक आयोजित करण्यात येईल, असं सांगण्यात आलं. त्यामुळे विरोधी पक्षांचा एकच सूर असल्याचं बघायला मिळालं. पण विरोधी पक्षांच्या या पहिल्याच एकजुटीच्या बैठकीला धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

विरोधी पक्षांच्या पाटण्यातील आजच्या बैठकीला आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल हे सुद्धा उपस्थित होते. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान देखील उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसला सर्व मतभेद बाजूला सारुन एकत्र येण्याचं आवाहन केलं. यासाठी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीचं उदाहरण दिलं. आम्ही 25 वर्ष एकमेकांना शिव्या दिल्या. पण आज एकत्र आलो, असं शरद पवार यांनी सांगितलं. पण त्यानंतरही अरविंद केजरीवाल यांचं मतपरिवर्तन झालेलं नसल्याचं बघायला मिळत आहे.

‘आप’ची नेमकी भूमिका काय?

आम आदमी पक्षाने विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर आपली भूमिका जारी केली आहे. सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या वादावर मोठा निकाल दिला होता. सुप्रीम कोर्टाने अधिकाऱ्यांचा बदल्यांचा अधिकार दिल्ली सरकारकडे दिला होता. पण केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या काही ओळींचा उल्लेख करत नवा अध्यादेश काढला होता.

या अध्यादेशाच्या विरोधात दिल्ली सरकार सुप्रीम कोर्टात गेलं आहे. तसेच या अध्यादेशाला काँग्रेस जोपर्यंत विरोध करणार नाही तोपर्यंत विरोधी पक्षांच्या पुढील बैठकींमध्ये सहभागी होणं कठीण आहे, ज्यामध्ये काँग्रेस सहभागी आहे, अशी भूमिका आम आदमी पक्षाने घेतली आहे.

काँग्रेसच्या 31 राज्यसभेच्या खासदारांनी या अध्यादेशाविरोधात राज्यसभेत भूमिका मांडावी, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली. विरोधी पक्षांच्या बैठकीत 15 पैकी 12 पक्षांचे राज्यसभेत प्रतिनिधी आहेत. त्यापैकी 11 पक्षांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे की, राज्यसभेत ते या अध्यादेशाला विरोध करणार. पण काँग्रेसने आपली भूमिका मांडलेली नाही. याउलट काँग्रेसच्या दिल्ली आणि पंजाब युनिट्सने घोषणा केली आहे की, या मुद्द्यावरुन पक्षाने भाजप सरकारचं समर्थन करावं, असं आम आदमी पक्षाने म्हटलं आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...