AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, महिला-लहान मुलं जखमी, नेमकं काय घडलं?

बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात व्हिआयपी पासच्या गेटवर मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ६ जण जखमी झाले आहेत. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. आयोजकांनी मनमानी केली, असा आरोप बनवारी शरण महाराजांनी केलाय. तर जखमी महिलांनी व्हिआयपी पास असूनही आत प्रवेश नाकारल्याची तक्रार केली.

बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, महिला-लहान मुलं जखमी, नेमकं काय घडलं?
बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, महिला-लहान मुलं जखमी, नेमकं काय घडलं?
| Updated on: Nov 07, 2024 | 8:46 PM
Share

बागेश्वर धामचे पीठासीन पंडित धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमात आज अचानक चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीतल 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती आहे. राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात संबंधित घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कार्यक्रमासाठी VIP पास घेऊन जाणाऱ्या भाविकांना अडवण्यात आलं. भाविकांकडे व्हीआयपी पास असल्यानंतरही त्यांना आत जाऊ दिलं गेलं नाही. त्यामुळे गेटवर गर्दी इतकी वाढली की, थेट चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली.

या प्रकरणी बनवारी शरण महाराजांनी आयोजकांवर मनमानीचा गंभीर आरोप केला आहे. व्हीआयपी पासच्या नावाने कमिटीने मनमानी केली, असा आरोप त्यांनी केला. काठिया बाबा आश्रम परिसरात बागेश्वर बाबांच्या कथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कमिटीने आश्रमच्या बाबांचं ऐकलंच नाही, असा आरोप आता केला जातोय. काठिया बाबा महंत बनवारीशरण महाराजांनी कमिटी आणि पोलिसांवरही आरोप केले.

महिलेने सांगितली आपबीती

या घटनेत जखमी झालेल्या महिला चंद्रकला सोमानी यांनी प्रतिक्रिया दिली. “माझ्याकडे व्हीआयपी पास होता. मी बागेश्वर बाबांच्या कथेत सहभागी होण्यासाठी व्हीआयपी गेटवर पोहोचले होते. पण मला आतमध्ये जाऊ दिलं नाही. त्यावेळी अनेकजण व्हीआयपी गेटवर जमले होते. त्यांनाही आतमध्ये प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळेच तिथे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली”, असं चंद्रकला सोमानी यांनी सांगितलं.

“व्हीआयपी बैठकीच्या ठिकाणी जागा नव्हती मग पास का दिले?”, असा सवाल चंद्रकला सोमानी यांनी केला. “आम्हाला बाबाची कथा ऐकायला मिळाली नाही. याउलट आम्ही जखमी झालो, असं चंद्रकला सोमानी म्हणाले. परिस्थिती इतकी भयानक होती की आम्हाला वाटलं आता आमचा जीव जाईल. पोलीस देखील आमच्यासोबत अरेरावीने बोलत होते”, असा आरोप महिलेने केले.

डुप्लिकेट पास घेऊन लोक आतमध्ये येत होते, समितीचा आरोप

दरम्यान, आयोजक समितीकडूनही या घटनेवर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आयोजक समितीचे संयोजक आशिष यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही व्हीआयपी पास जारी केले होते. पण अनेक जण डुप्लिकेट पास बनवून घेऊन येत होते. त्याच लोकांना आम्ही आतमध्ये जाण्यास रोखत होतो. पण लोकांची मनमानी सुरु होती. अशा लोक व्हीआयपी गेटवर मोठ्या संख्येने जमा झाल्यामुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली. पण पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. जे लोक जखमी झाले त्यांच्यावर तिथेच उपचारही केला गेला, अशी प्रतिक्रिया समितीचे संयोजक आशिष यांनी दिली.

Follow Us
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले...
विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं चार शब्दात उत्तर, म्हणाले....
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत.
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल.
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर....
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर.....
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.