AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : तेल संकटामुळे सगळं जग टेन्शनमध्ये पण चीनला मानलं, जी तयारी केलीय त्याला तोड नाही, एकदा वाचा

Explainer : मध्य पूर्वेत इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्ध सुरु आहे. त्यामुळे जगातील अनेक देश तेल संकटाच्या सावटाखाली आहेत. पण चीन एकदम बिनधास्त आहे, त्यांना अजिबात फिकिर नाहीय. त्यामागे काही कारणं आहेत. चीनने जी तयारी केलीय, त्यांना खरच मानावं लागेल.

Explainer : तेल संकटामुळे सगळं जग टेन्शनमध्ये पण चीनला मानलं, जी तयारी केलीय त्याला तोड नाही, एकदा वाचा
China Oil
| Updated on: Mar 17, 2026 | 2:39 PM
Share

अमेरिका-इस्रायलचं इराण विरोधात सुरु असलेलं युद्ध आणि स्ट्रेट ऑफ हॉमुर्झमध्ये इराणची नाकेबंदी यामुळे जागतिक तेल बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. स्ट्रेट ऑफ हॉमुर्झ जल वाहतुकीचा एक महत्वाचा मार्ग आहे. जगातील 20 टक्के तेलाची वाहतूक या मार्गावरुन होते. इथे वाहतूक बाधित झाली, तर तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम होतील अशी जगातील अनेक देशांना भिती आहे. त्यामुळे अनेक देश चिंतेत आहेत. भारताने सुद्धा कूटनितीचा मार्ग अवलंबला. इराणशी चर्चा केल्यानंतर त्यांनी भारताची काही जहाजं सोडली. सगळे देश टेन्शनमध्ये असले तरी चीन मात्र बिनधास्त आहे. एक्सपर्ट्सच्या मते चीन अशा संकटाचा सामना करण्याची खूप आधीपासून तयारी करत आहे. जागतिक तेल पुरवठ्यात काही अडथळे आल्यास आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून चीनने खूप आधीच तयारी करुन ठेवली होती. यात तेल साठवणूक भंडार बनवणं, ऊर्जा पुरवठ्याच्या स्त्रोतांच विविधीकरण, दीर्घकालीन ऊर्जा करार आणि जागतिक गुंतवणूकीसारखी पावलं चीनने आधीच उचलली होती.

चीनच्या इंधनाच्या ज्या गरजा आहेत, त्यातला मोठा हिस्सा ते मध्य पूर्वेतून आयात करतात. ऊर्जा विश्लेषण फर्म Kpler च्या 2025 च्या आकड्यांनुसार, चीन इराणकडून 80 टक्के तेल खरेदी करतो. मागच्यावर्षी चीनने प्रतिदिन सरासरी 13.8 लाख बॅरल तेल इराणकडून आयात केलं. समुद्री मार्गाने होणाऱ्या तेल आयातीचं हे प्रमाण जवळपास 13.4 टक्के आहे. दुसरीकडे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून दरदिवशी जवळपास 2 कोटी बॅरल तेलाची वाहतूक होते. जागतिक तेल विक्रीतील हा 20 टक्के वाटा आहे. म्हणूनच या अरुंद समुद्र मार्गावरील कुठल्याही अडथळ्यामुळे जागतिक तेल व्यापार प्रभावित होऊ शकतो. सध्याच्या तणावामुळे टँकर्सची वाहतूक कमी झाली आहे. तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे आहेत.

तेल पुरवठा बाधित झाल्यास चीनने काय प्लान केलाय?

चीनच्या तयारीचा सर्वात मोठा भाग त्यांचे रणनितीक पेट्रोलियम भंडार आहेत. मागच्या दोन दशकात चीनने देशभरात विशाल तेल साठवणुकीच्या सुविधा विकसित केल्या आहेत. यात कोट्यवधि बॅरल कच्चं तेल संग्रहित केलं जातं. या भांडारामुळे चीनला 100 पेक्षा अधिक दिवस तेल पुरवठा सुरळीत सुरु राहू शकतो. तेल पुरवठा बाधित झाल्यास देशाला पर्यायी व्यवस्था करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाल्याचा चीनला का फरक पडत नाही?

चीन ऊर्जा पुरवठ्यासाठी फक्त मध्य-पूर्वेवर अवलंबून नाहीय. रशिया सुद्धा बीजिंगचा एक महत्वपूर्ण ऊर्जा भागीदार म्हणून पुढे आला आहे. पाइपलाइन नेटवर्क आणि दीर्घकालिन करारामुळे चीनला रशियाकडून थेट तेल आणि गॅसचा पुरवठा होतो. त्यामुळे समुद्री मार्गावर पूर्णपणे अवलंबून राहण्याची गरज नाही. एक्सपर्ट्नुसार इराणकडून तेल पुरवठा बाधित झाल्यास चीनचं रशियासोबत ऊर्जा सहकार्य, भागीदारी अजून मजबूत होईल. त्याशिवाय चीनने आफ्रिका, मध्य आशिया आणि लॅटिन अमेरिकेतून तेल आयात वाढवून तेल पुरवठा वेगवेगळ्या क्षेत्रात विभाजीत केलाय. त्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाल्याचा चीनला फार फरक पडत नाही.

चीन-इराणमध्ये काय करार?

ऊर्जा स्त्रोतांचा विस्तार केल्यानंतरही चीन इराणसोबत आपले ऊर्जा संबंध ठेऊन आहे. दोन्ही देशांमध्ये 25 वर्षांसाठी रणनितीक सहकार्याचा करार झाला आहे. त्यानुसार चीन इराणच्या इराणच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऊर्जा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करतो. त्या बदल्यात त्यांना स्थिर तेल पुरवठा होतो. या करारामुळे चीनला भू-राजकीय तणाव असूनही अपेक्षेनुसार स्वस्त इराणी तेल मिळतं.

चीनने कुठे आणि कशात गुंतवणूक केलीय?

ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी चीनने जागतिक स्तरावर पायाभूत सोयी-सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. बेल्ट एंड रोड उपक्रमातंर्गत आशिया, मध्य-पूर्व आणि आफ्रिकी बंदरं, पाइपलाइन, कॉरिडोअर त्यांनी विकसित केले आहेत. या योजनांचा उद्देश व्यापार वाढवण्यासह ऊर्जा पुरवठ्यासाठी पर्यायी मार्ग तयार करणं आहे. मध्य आशिया आणि रशियातून पाइपलाइन मार्गे येणाऱ्या तेल-गॅसमुळे समुद्री मार्गावरील चीनचं अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे.

सैन्य संघर्षापासून लांब

मध्य-पूर्वेत चीनचं आर्थिक हित आहे. त्याशिवाय बीजिंगचा प्रयत्न नेहमी सैन्य संघर्ष टाळण्याचा असतो. चीनचे सुद्धा दक्षिण चीन समुद्रात अनेक देशांसोबत वाद आहेत. पण चीनने कधीच ते सैन्य संघर्षात बदलू दिलेले नाहीत. चीन अशा विषयात नेहमी कूटनितीक मार्गाने तोडगा शोधण्याचा, संवादाचा प्रयत्न करतो. त्यांचे विभिन्न देशांसोबत संतुलित संबंध आहेत. वादविवाद असले तरी युद्धात उतरायचं नाही हा चीनचा प्रयत्न असतो.

जबरदस्त प्लानिंग

विद्यमान संकटातून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे दीर्घकालिक ऊर्जा रणनितीमुळे अन्य देशांच्या तुलनेत चीन चांगल्या स्थितीत आहे. तेल भांडार, विविध पुरवठा स्त्रोत आणि जागतिक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक याद्वारे चीनने दीर्घकालिन तयारी करुन ठेवली आहे. जगातील महत्वाच्या तेल वाहतुकीच्या मार्गांपैकी होर्मुझ स्ट्रेट आज अस्थिर आहे. पण अशी वेळ येऊ शकते हे लक्षात घेऊन चीनने आधीच तयारी करुन ठेवली होती, हे विशेष.

Follow Us
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत.
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ.
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप.
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची.....
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
गॅस मुद्द्यावरून राजकारण तापलं; ठाकरे-सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल.
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर....
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? संजय राऊत यांचं एका वाक्यात उत्तर.....
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या...
राज्यात गॅस मुबलक असल्याचा सरकारचा दावा, तरीही मंत्री भुजबळ यांच्या....
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.