AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याला भाऊ मानलं त्यानेच केला पाकिस्तानचा मोठा गेम, नव्या संकटानं शहबाज शरीफ, मुनीर यांची उडाली झोप

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान चारही बाजुनं संकटात सापडला आहे, भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत, आता आणखी एका नव्या संकटाला पाकला तोंड द्यावं लागणार आहे.

ज्याला भाऊ मानलं त्यानेच केला पाकिस्तानचा मोठा गेम, नव्या संकटानं शहबाज शरीफ, मुनीर यांची उडाली झोप
| Updated on: May 19, 2025 | 10:02 PM
Share

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त झाले, यामध्ये शंभर पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला, या कारवाईनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं पाकिस्तानचा हल्ला परतून लावला, त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भारतानं केलेल्या कारवाईत पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे, पाकिस्तानचे अनेक एअर बेस उद्ध्वस्त झाले आहेत. भातानं पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. त्यानंतर पाकिस्तानला धक्क्यावर धक्के बसत आहेत.

आता आणखी एक मोठा धक्का पाकिस्तानला बसला आहे, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि सेना प्रमुख असीम मुनीर यांच्यासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. ज्याच्याकडून मित्रत्वाची अपेक्षा ठेवली होती, त्याच्याकडूनच पाकिस्तानला मोठा धोका मिळाला आहे. एका रिपोर्टनुसार बांगलादेशमधील नागरिक मोठ्या संख्येनं पाकिस्तानमधील सर्वात मोठी दहशतवादी संघटना असलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) मध्ये सहभागी होत आहेत. काही दिवसांपूर्वीच तहरीक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांवर पाकिस्तानी सैन्यानं हल्ला केला होता. या हल्ल्यात 54 दहशतवादी मारले गेले, त्यामध्ये एका बांगलादेशी नागरिकाचा देखील समावेश होता.अहमद जोबेर असं या व्यक्तीचं नाव आहे, तो आधी बांगलादेशातून सऊदी अरेबियामध्ये गेला आणि तिथून या दहशतवादी संघटनेत भरती झाला.

बांगलादेशच्या एका स्थानिक पोर्टलने केलेल्या दाव्यानुसार सध्या आठ बांगालादेशी नागरिक तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानमध्ये सक्रीय आहेत. ही दहशतवादी संघटना पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यातच आता बांगलादेशी नागरिक देखील या संघटनेत सहभागी होत आहेत, त्यामुळे पाकिस्तान समोर दुहेरी संकट निर्माण झालं आहे, काही बांगलादेशी नागरिक हे सोशल मीडियाच्या माध्यमातून टीटीपीसाठी काम करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

एकीकडे पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे, भारतानं पाकिस्तानची कोंडी केली आहे. तर दुसरीकडे आता आणखी एका संकटानं डोकं वर काढलं आहे, बांगलादेशी नागरिक मोठ्या संख्येनं तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानमध्ये सहभागी होत आहेत, या रिपोर्टमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.