AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्या भारत बंदची हाक, कोणत्या सेवांवर परिणाम होणार? वाचा…

उद्या (9 जुलै) 25 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. याचा मोठा परिणाम संपूर्ण देशावर होण्याची शक्यता आहे. या भारत बंदबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उद्या भारत बंदची हाक, कोणत्या सेवांवर परिणाम होणार? वाचा...
bharat bandh
| Updated on: Jul 08, 2025 | 6:01 PM
Share

देशभरातील जनतेसाठी महत्वाची बातमी आहे. उद्या (9 जुलै) 25 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. हे कर्मचारी सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक धोरणांविरोधात आंदोलन करणार आहेत. याचा मोठा परिणाम संपूर्ण देशावर होण्याची शक्यता आहे. या भारत बंदबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता

9 जुलै रोजी 10 केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहयोगी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये बँकिंग, विमा, टपाल, कोळसा खाणकाम, रस्तेवाहतूक, बांधकाम आणि राज्यातील वाहतूकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्य जनतेला त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

भारत बंदमध्ये कोण-कोणत्या संघटना सहभागी

उद्याच्या भारत बंदमध्ये AITUC, HMS, CITU, INTUC, INUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC या संघटना सहभागी होणार आहेत. संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी कामगार संघटनांच्या संयुक्त आघाडीनेही या संपाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे ग्रामीण भागातही या बंदचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. मात्र आरएसएसशी संलग्न असलेली भारतीय मजदूर संघ हा संघटना बंदमध्ये सहभागी होणार नाही.

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या नेत्या अमरजीत कौर म्हणाल्या की, ‘या बंदमध्ये 25 कोटींहून अधिक कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता आहे. देशभरातील शेतकरी आणि कामगार या बंदमध्ये सामील होणार आहेत. तसेच हिंद मजदूर सभेचे नेते हरभजन सिंग सिद्धू म्हणाले की, ‘या संपामुळे बँकिंग, टपाल, कोळसा खाण, कारखाने, राज्यांमधील वाहतूक सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.’

कर्मचाऱ्यांनी संप का पुकारला आहे ?

संप पुकारणाऱ्या संघटनांचे म्हणणे आहे की, आम्ही कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे 17 कलमी मागण्यांची सनद सादर केली होती, मात्र यावर अद्याप विचार झालेला नाही. सरकार गेल्या 10 वर्षांपासून वार्षिक कामगार परिषद आयोजित करत नाहिये, तसेच नवीन कामगार संहितेद्वारे कामगार संघटनांना कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे, कामाचे तास वाढवले ​​जात आहेत, तसेच कामगारांचे हक्क कमी केले जात आहेत त्यामुळे हा संप पुकारण्यात आला आहे.

दरम्यान, कामगार संघटनांनी यापूर्वी 26 नोव्हेंबर 2020, 28-29 मार्च 2022 आणि 16 फेब्रुवारी 2024 रोजी अशाच प्रकारचे देशव्यापी संप पुकारले होते. आता 2025 मध्येही असाच संप पुकारण्यात आला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.