AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पक्ष फुटल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया, भाजपने पुन्हा एकदा…

राजकारणात एक मोठा भूकंप झाला आहे. आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. 7 खासदार भाजपमध्ये सामील होणार आहेत. यानंतर आता पक्षाने आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

मोठी बातमी! पक्ष फुटल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया, भाजपने पुन्हा एकदा...
Arvind KejrivalImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 24, 2026 | 5:43 PM
Share

आम आदमी पार्टीला मोठा राजकीय धक्का बसला आहे. राघव चड्ढा यांनी शुक्रवारी (२४ एप्रिल) मोठी घोषणा करताना सांगितले की, त्यांच्यासह पक्षाचे इतर सहा राज्यसभा खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी आम आदमी पार्टीवर निशाणा साधत म्हटले की, हा आता जुना पक्ष राहिला नाही. यावर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी आपल्या एक्स (ट्विटर)वर पोस्ट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते पोस्टमध्ये म्हणाले की, “भाजपने पुन्हा एकदा पंजाब्यांसोबत धक्का (अन्याय) केला.”

कोण कोण भाजपमध्ये सामील होणार?

१. राघव चड्ढा

२. अशोक मित्तल

३. स्वाती मालीवाल

४. हरभजन सिंग

५. संदीप पाठक

६. विक्रमजीत सिंह साहनी

७. राजेंद्र गुप्ता

ईडीचा छापा टाकला आणि फोडले – संजय सिंह

दुसरीकडे, ‘आप’ खासदार संजय सिंह यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले, “ऑपरेशन लोटसचा खेळ खेळला जात आहे. आमच्या खासदारांना फोडले जात आहे. त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले जात आहे. ईडी-सीबीआयचा वापर केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच अशोक मित्तल यांच्याकडे ईडीचा छापा पडला होता. या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. ईडीचा छापा पडला आणि त्यांना फोडले. याचा अर्थ भीती दाखवून आणि प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर करून ‘ऑपरेशन लोटस’ चालवले जात आहे.”

‘मी त्यांच्या मैत्रीच्या लायकीचा नव्हतो कारण…’ – राघव चड्ढा

खासदार राघव चड्ढा म्हणाले, “मी गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न करत होतो. मी स्वतःला पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर केले. कारण मला त्यांच्या गुन्ह्यात सहभागी व्हायचे नव्हते. मी त्यांच्या मैत्रीच्या लायकीचा नव्हतो. कारण मी त्यांच्या गुन्ह्यात सामील नव्हतो. आमच्याकडे दोनच पर्याय होते. एक तर राजकारण सोडणे किंवा आपल्या अनुभवासह सकारात्मक राजकारण करणे. म्हणूनच आम्ही निर्णय घेतला की, राज्यसभेतील ‘आप’चे दोन-तृतीयांश खासदार स्वतःला भाजपमध्ये विलीन (मर्ज) करत आहोत.”

Follow Us
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...
ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविआत हालचालींना वेग; काँग्रेसची सावध भूमिका
ठाकरेंच्या उमेदवारीसाठी मविआत हालचालींना वेग; काँग्रेसची सावध भूमिका.