AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘500 कोटी द्या अन् मुख्यमंत्रीपद मिळवा’, माजी मंत्र्याच्या विधानाने संपूर्ण देशात खळबळ

Navjot Kaur Sidhu : पंजाब सरकारमधील माजी मंत्री नवज्योत कौर सिद्धू यांच्या एका विधानाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री बनण्यासाठी 500 कोटी रुपये लागतात असं कौर यांनी म्हटल्याने आता काँग्रेसवर टीका होताना दिसत आहे.

'500 कोटी द्या अन् मुख्यमंत्रीपद मिळवा', माजी मंत्र्याच्या विधानाने संपूर्ण देशात खळबळ
navjot kaur sidhuImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Dec 08, 2025 | 7:21 PM
Share

काँग्रेसच्या नेत्या आणि पंजाब सरकारमधील माजी मंत्री नवज्योत कौर सिद्धू यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री बनण्यासाठी 500 कोटी रुपये लागतात असं नवज्योत कौर सिद्धू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राजकीय क्षेत्रातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप आणि आम आदमी पार्टीने यामुळे काँग्रेसची कार्यपद्धतीचे काळे सत्य समोर आल्याचे आणि हा पक्ष पद विकत असल्याचे म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नवज्योत कौर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते की, ‘जर काँग्रेसने पंजाबमध्ये आम्हाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केले तर माझे पती पुन्हा सक्रिय राजकारणात येतील. पंजाबच्या निवडणुका 2027 मध्ये होणार आहेत. आम्ही नेहमीच पंजाब आणि पंजाबच्या लोकांच्या हिताचा विचार करतो. पण मुख्यमंत्री होण्यासाठी आमच्याकडे 500 कोटी रुपये नाहीत.’ नवज्योत कौर यांच्या या विधानावरून हे स्पष्ट होते की ज्या व्यक्तीकडे 500 कोटी रुपये असतील त्या व्यक्तीला काँग्रेसची सत्ता असल्यास मुख्यमंत्रीपद मिळते.

आम आदमी पक्षाने काय म्हटले ?

नवज्योत कौर यांच्या विधानावर सत्ताधारी आम आदमी पार्टीने भाष्य केले आहे. आपचे सरचिटणीस बलतेज पन्नू यांनी एक निवदन जारी करत म्हटले की, ‘नवज्योत कौर सिद्धू यांनी दोन स्फोटक दावे केले आहेत. पहिला दावा म्हणजे, जर काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केले तरच ते पंजाबच्या राजकारणात सक्रीय होतील. दुसरा दावा म्हणजे सिद्धू यांच्याकडे 500 कोटी रुपये नाहीत. याचा अर्थ असा की काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी 500 कोटी रुपये लागतात.

पुढे बोलताना पन्नू यांनी म्हटले की, ‘सिद्धू यांच्याकडे 500 कोटी रुपये नाहीत, मग इतके पैसे कोणत्या नेत्याकडे आहेत? हे पैसे कुठे जातात? राज्य युनिट अध्यक्षांकडे? हायकमांडकडे? राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे? पंजाबच्या लोकांना या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.’

भाजपचीही टीका

नवज्योत सिद्धू यांच्या विधानावर भाजपचे पंजाब युनिटचे अध्यक्ष सुनील जाखड यांनीही भाष्य केले आहे. ते 2022 साली काँग्रेसमधून भाजपात आले होते. ते म्हणाले की, ‘काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी अनेक निकष आहेत. मी नवजोत कौर यांचे 500 कोटी रुपयांचे विधान ऐकले. मात्र मी ऐकले होते की मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी 350 कोटी रुपये लागतात.

या प्रकरणावर बोलताना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांनी म्हटले की, ‘नवजोत कौर यांनी पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाची किंमत 500 कोटी रुपये आहे आणि ते इतके पैसे देऊ शकत नाहीत असं जाहीरपणे सांगितले आहे. यामुळे काँग्रेसमधील पैशाच्या ताकदीचे राजकारण उघड झाले आहे. आता यावर स्पष्टीकरण देताना नवज्योत कौर यांनी माझ्या वक्त्व्याचा विपर्यास केला असं म्हटलं आहे.

Follow Us
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?