AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात नवा एक्का? ‘जंगलराज’ ची प्रतिमा लालू विसरतील? काय घडतंय बिहारमध्ये?

बिहारच्या राजकारणात आता वेगळाच ट्विस्ट बघायला मिळणार आहे, चित्रपटातून राजकीय नेत्यांच्या भूमिका साकारणार मनोज वाजपेयी आता खराखुऱ्या राजकारणातकडे वळला आहे.

राजकारणात नवा एक्का? 'जंगलराज' ची प्रतिमा लालू विसरतील? काय घडतंय बिहारमध्ये?
| Updated on: Sep 19, 2022 | 2:54 PM
Share

नवी दिल्लीः आपल्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयाने, आणि चित्रपटाच्या माध्यमातून लोकांवर छाप सोडणाऱ्या मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांची लालू यादव यांच्याबरोबर भेट झाल्यानंतर आता राजकीय चर्चेना जोरदार उधान आले आहे. मनोज वाजपेयी यांनी आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीत राजकीय नेत्यांचेही रोल केले आहेत. मात्र आता मनोज वाजपेयी खऱ्या आयुष्यातही नेता बनणार असल्याची चर्चा आहे. खरे तर मनोज वाजपेयी यांनी शनिवारी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्याबरोबर भेट घेतली.

त्यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मनोज वाजपेयी आता आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करत असून त्यामुळेच त्यांनी लालू प्रसाद यादवांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे.

लालू प्रसाद यादव आणि अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं असलं तरी ही भेट सहजा सहजी झाली नाही असं काही राजकीय विश्लेषक मानतात. या भेटीमुळे बिहारच्या राजकारणावर नक्कीच परिणाम होतील असंही मत व्यक्त केलं जात आहे.

मनोज वाजपेयी आता चित्रपटांनंतर राजकारणात आपलं नशीब आजमावणार आहेत. लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या भेटीमुळे आता त्यांच्या मतदार संघाचीही चर्चा होऊ लागले आहे. बिहारमधील बेतियामधून ते लोकसभा निवडणूक लढवू शकतात असंही बोललं जात आहे.

बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये आपल्या पक्षाचे स्थान बळकट करण्यासाठी भाजप जोरदार तयारी करत आहे. त्यासाठी सिनेअभिनेते, कलाकारांना त्यांच्याकडून संधी दिली जात आहे.

मनोज तिवारी, रवी किशन, दिनेश लाल निरहुआ यांसारख्या अभिनेत्यांना राजकारणात आणून त्यांच्यासारख्या उमेदवारांना आता प्रोत्साहन दिले जात आहे.

त्यामुळे आता तेजस्वी यादव आणि राजद मनोज वाजपेयींच्या माध्यमातूनही आपले ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न राजदकडून केला जात आहे. त्यासाठीच बिहारच्या मातीशी आणि माणसांशी जवळचा असणारा चेहरा आहे.

बिहारमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप याला जंगलराज वापसी म्हणत आहे. माजी कायदा मंत्री कार्तिकेय कुमार यांच्या नावाने महाआघाडी सरकारची विशेषत: राजदची संपूर्ण देशात नामुष्की ओढावल्यामुळेही त्याचा परिणाम राजकारणावर झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

मनोज वाजपेयी यांच्या आगमानामुळे आता राजदकडे एक चांगला चेहरा असल्याचे मत राजकीय नेत्यांसह राजकीय विश्लेषकही मानत आहेत.

लालू प्रसाद यादव यांची मनोज वाजपेयींनी भेट घेतल्यानंतर आगामी निवडणुकीत राजदमध्ये ते सामील होऊ शकतात, असंही ते बोलले जात आहे. मनोज वाजपेयी यांना राजदमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

यासोबतच त्यांना आगामी काळात राज्यसभा सदस्य म्हणूनही खासदार केले जाऊ शकते. मनोज वाजपेयी हे बिहारमधील बेतिया येथील रहिवासी असून तो जातीने ब्राह्मण आहे आणि बॉलीवूडमधील एक प्रस्थापित नावही आहे.

अशा स्थितीत बेतियामधून भाजपच्या विरोधात त्यांच्या नावाचाही विचार केला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.