AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Political Crisis | बिहारमध्ये सरकार वाचवण्यासाठी लालू प्रसाद यादव यांची मोठी खेळी

Bihar Political Crisis | बिहारमध्ये सत्तापालट होऊ शकतो. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपासोबत जाण्याची तयारी केली आहे. या राजकीय बदलाचा देशपातळीच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होईल. काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडी अधिक कमकुवत होईल.

Bihar Political Crisis | बिहारमध्ये सरकार वाचवण्यासाठी लालू प्रसाद यादव यांची मोठी खेळी
Bihar political crisis
| Updated on: Jan 26, 2024 | 2:52 PM
Share

Bihar Political Crisis | बिहारच्या राजकारणात मोठी राजकीय उलथा-पालथ होऊ शकते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार NDA मध्ये जाऊ शकतात. त्यामुळे देशपातळीवरील राजकारणातील समीकरण बदलणार आहेत. सध्या JDU सोबत सत्तेमध्ये असलेला RJD म्हणजे राष्ट्रीय जनता दल बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,राजदने माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचा मुलगा संतोष सुमन मांझीला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. हिन्दुस्तान आवाम मोर्चाचे नेते संतोष सुमन मांझी यांनी नितीश कॅबिनेटमधून जून 2023 मध्ये राजीनामा दिला. जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चाकडे चार आमदार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, असदुद्दीन ओवैसीच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनकडून (AIMIA) राष्ट्रीय जनता दलाने समर्थन मागितलय. AIMIM च्या एका आमदाराला सोबत घेण्यासाठी राजदचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपा खासदार नित्यानंद राय यांना जीतन राम मांझींना सोबत घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

बिहारमध्ये आकड्यांचा खेळ कसा आहे?

बिहार विधानसभेत सध्या राजदचे 79 आमदार आहेत. राष्ट्रीय जनता दल बिहार विधानसभेतील मोठी पार्टी आहे. त्याशिवाय भाजपाचे 78, जदयूचे 45, काँग्रेसचे 19, हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे चार, माकपाचे 2, AIMIM चा 1 आणि एक अपक्ष आमदार आहे.

बिहारच्या विद्यमान राजकीय स्थितीवर भाजपाचे आमदार तारकिशोर प्रसाद यांनी सांगितलं की, “बिहार भाजपाच्या काही नेत्यांना बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं. लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली. भाजपा बिहारच्या हिताचा आणि देशाच्या विकासावर निर्णय घेते. राजकारणात दरवाजे कधीच बंद होत नसतात. पक्षाच केंद्रीय नेतृत्व बिहारच्या हिताचा निर्णय घेईल”

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...