AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खान एक अट पूर्ण करताच 26 वर्ष जुना वाद मिटणार, बिश्नोई समाजाची माफी देण्याची तयारी पण…

bishnoi community and salman khan: बिश्नोई समाजचे जे 29 नियम आहेत त्यातील दहावा नियम क्षमा करण्यासंदर्भात आहे. आमचे धर्मगुरु भगवान जंभेश्वर यांनी हे 29 नियम बनवले आहे. त्यानुसार कोणी काही गुन्हा केला, त्यासाठी त्याने क्षमा मागितली, त्याच्या मनात क्षमा भाव असेल तर त्याला माफ करत येते

सलमान खान एक अट पूर्ण करताच 26 वर्ष जुना वाद मिटणार, बिश्नोई समाजाची माफी देण्याची तयारी पण...
salman khan
| Updated on: Oct 22, 2024 | 7:12 AM
Share

bishnoi community and salman khan: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येत लॉरेन्स बिश्नाईचे नाव आले. त्यानंतर बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि काळवीट शिकार प्रकरण पुन्हा चर्चेत आले. सलमान खान आणि बिश्नोई समाजातील वाद मिटण्याची चिन्ह निर्माण झाला आहे. कळवीट शिकर प्रकरणात सलमान खानवर बिश्नोई समाज नाराज आहे. 1998 पासून सुरु असलेला हा जुना वाद मिटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. भारतीय बिश्नोई महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी पुढाकर घेतला आहे. त्यांनी त्यासाठी एक अट ठेवली आहे. सलमान खानने माफी मागितली तर बिश्नोई समाज त्याला माफ करेल, असे देवेंद्र बुडिया यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले देवेंद्र बुडिया

स्थानिक माध्यमांशी बोलताना भारतीय बिश्नोई महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी सांगितले की, सलमान खान या ठिकाणी आला पाहिजे. त्याने आपली चूक कबूल करावी आणि माफी मागावी. त्यानंतर बिश्नाई समाजातील ज्येष्ठ मंडळी एकत्र बसतील आणि गुरु जंभेश्वर यांनी सांगितलेल्या 29 नियमांनुसार माफी देण्याचा निर्णय घेऊ शकतात.

काय होतो तो प्रकार

सलमान खान 1998 मध्ये ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी जोधपूरला गेला होता. चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या भावड गावाजवळ सलमान खानने काळवीटाची शिकार केल्याचा आरोप त्याच्यावर होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. सलमान खान याला तुरुंगात जावे लागले होते. हे प्रकरण अजूनही न्यायालयात सुरु आहे. या घटनेमुळे बिश्नोई समाज सलमान खानवर नाराज आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या आणि त्यापूर्वी सलमान खानच्या घरावर गोळीबार या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आले. त्यामुळे हा समाज सलमान खानला माफ करणार की नाही? ती चर्चा आता सुरु झाली आहे. त्यावर देवेंद्र बुडिया यांनी भूमिका स्पष्ट केली.

देवेंद्र बुडिया यांनी म्हटले की, बिश्नोई समाजचे जे 29 नियम आहेत त्यातील दहावा नियम क्षमा करण्यासंदर्भात आहे. आमचे धर्मगुरु भगवान जंभेश्वर यांनी हे 29 नियम बनवले आहे. त्यानुसार कोणी काही गुन्हा केला, त्यासाठी त्याने क्षमा मागितली, त्याच्या मनात क्षमा भाव असेल तर त्याला माफ करत येते. आमचा समाज कधी कोणाचे नुकसान करणार नाही. जेव्हा कोणी मनात क्षमाची भावना घेऊन येतो तेव्हा समाजातील प्रतिष्ठित लोक एकत्र बसून त्याला माफ करण्याचा निर्णय घेतात.

हे ही वाचा…

550 वर्षे जुने नाते… बिष्णोई समाज काळवीटचा का करतो इतका आदर, सलमान खानने तोडले होते 9 नियम

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.