AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे यांना बृजभूषण यांचे आव्हान, इतिहास सांगत दिला हा सल्ला

बृजभूषण शरण सिंह म्हणाले, मी राज ठाकरे यांना सांगू इच्छितो की त्यांनी थोडे वाचावे. आज ज्या गोष्टींचा तुम्हाला अभिमान आहे, त्या अभिमानाच्या इतिहासात उत्तर भारतीयांचा घाम आहे. तुम्ही खूप स्वस्त राजकारण करत आहात.

राज ठाकरे यांना बृजभूषण यांचे आव्हान, इतिहास सांगत दिला हा सल्ला
| Updated on: Jul 11, 2025 | 10:57 AM
Share

राज्यातील शाळांमध्ये करण्यात येणारी हिंदी सक्तीच्या विषयांवर आक्रमक पवित्रा घेतलेल्या मनसे नेते राज ठाकरे यांना भाजप नेत्याने आव्हान दिले आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. ‘भाषा जोडण्याचे काम करते, तोडण्याचे नाही. महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय यांचे जे नाते आहे, ते तुमच्या या प्रकारामुळे तुटणार नाही,’ असे बृजभूषण यांनी म्हटले आहे.

बृजभूषण काय म्हणाले?

बृजभूषण शरण सिंह म्हणाले, मी राज ठाकरे यांना सांगू इच्छितो की त्यांनी थोडे वाचावे. आज ज्या गोष्टींचा तुम्हाला अभिमान आहे, त्या अभिमानाच्या इतिहासात उत्तर भारतीयांचा घाम आहे. तुम्ही खूप स्वस्त राजकारण करत आहात. छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगजेबाने जेव्हा आग्रात कैद केले होते, तेव्हा आमच्या आग्रा येथील व्यापाऱ्यांनी त्यांना मुक्त करण्यासाठी मदत करत होती.

…तर ते आव्हान राज ठाकरे पेलू शकणार नाही

राज ठाकरे यांच्यावर टीका करताना बृजभूषण म्हणाले, राज ठाकरे यांनी जेव्हा अयोध्येत येण्याचा कार्यक्रम निश्चित केला, तेव्हा मी त्यांना अयोध्येत येऊ न देण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी आपला दौरा रद्द केला. परंतु आता पुन्हा आपले रंग दाखवत आहेत. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे उत्तर भारतीयांमध्ये खूप राग आहे. यामुळे उत्तर भारतीयांमधील एखाद्या मोठ्या व्यक्तीने राज ठाकरे यांना आव्हान दिले तर ते पेलू शकणार नाही. त्यामुळे माझा राज ठाकरे यांना सल्ला आहे, राजकारण करा, परंतु भाषा, जाती, धर्म यांना आधार घेऊ नका, असे त्यांनी म्हटले.

फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र लागू केले होते. शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केली होती. त्या निर्णयाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता. त्यासाठी ५ जुलै रोजी मोर्चा काढणार होते. त्यापूर्वीच फडणवीस सरकारने हा निर्णय रद्द करत नरेंद्र जाधव यांची समिती नेमली. मोर्चा रद्द झाल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांनी विजयी सभा घेतली. त्यावेळी २० वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र एका व्यासपीठावर आले.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....