AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐकावं ते नवलचं! भाजप आमदार स्वपक्षाच्या खासदाराविरोधात 101 तासांचा उपवास धरणार

उत्तर प्रदेशातील भाजप आमदार सुरेंद्र सिंह त्यांच्या पक्षाचे खासदार विरेंद्र सिंह मस्त याच्या विरोधात मैदानात उतरले आहेत Surendra Singh Virendra Singh

ऐकावं ते नवलचं! भाजप आमदार स्वपक्षाच्या खासदाराविरोधात 101 तासांचा उपवास धरणार
आगामी निवडणुका भाजपसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. अशात भाजपने पक्षातील अनुभवी आणि विश्वासपात्र नेत्यांकडे जबाबदारी देण्यास सुरुवात केली आहे.
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Jan 27, 2021 | 4:45 PM
Share

लखनऊ: उत्तर प्रदेशातील भाजप आमदार सुरेंद्र सिंह त्यांच्या पक्षाचे खासदार विरेंद्र सिंह मस्त याच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. विरेंद्र सिंह भूमाफिया असल्याचा आरोप सुरेंद्र सिंह यांनी केला आहे. ते आता विरेंद्र सिंह मस्त आणि बालियाचे जिल्हाधिकारी यांना चांगला विचार करता यावा यासाठी 101 तासांचा उपवास धरणार आहेत. सुरेंद्र सिंह यांनी जिल्हाधिकारी एच.पी. सिंह यांच्यावर खासदारांच्या दबावात काम करत असल्याचा आरोप केला आहे. (BJP MLA Surendra Singh will go on fast against BJP MP Virendra Singh Mast)

बालियामधील बैरियामधील आमदार सुरेंद्र सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत खासदार विरेंद्र सिंह मस्त यांच्यावर आरोप केले. विरेंद्र सिंह मस्त हे भूमाफिया असल्याचा आरोप केला. खासदारांनी त्यांचा मुलगा, भाऊ आणि भाच्याच्या नावावर बैरियामध्ये शिवपूर गावातील विजय बहादूर सिंह यांची 18 एकर जमीन फसवणूक करुन बळकावली होती. सुरेंद्र सिंह यांनी उपवासाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचं म्हटले. ते खासदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना सदबुद्धी मिळण्यासाठी 101 तासांचा उपवास करणार आहेत.

विरेंद्र सिंह मस्त काय म्हणाले?

भाजपा खासदार विरेंद्र सिंह यांनी आमदार सुरेंद्र सिंह यांच्याकडून करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक खासदार म्हणून माझी ओळख आहे. मात्र, मी शांत आहे याला माझी कमजोरी समजू नका, असं विरेंद्र सिंह यांनी ठणकावलं आहे. ‘समाजात द्वेष पसरवून कोणी समाजाचं भलं करु शकत नाही. मी बोलत नाही याचा अर्थ मी घाबरतो किंवा कमजोर आहे, असं समजू नका, असा इशारा विरेंद्र सिंह मस्त यांनी दिला.

सुरेंद्र सिंह यांच्या आरोपावर भाजप खासदार मस्त यांचे खासगी सचिव अमन सिंह यांनी भाजप आमदारांचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याचा दावा केलाय. माध्यमांसमोर आरोप करण्यापेक्षा आमदारांनी कायदेशीर लढाई लढावी,असं आवाहन अमन सिंह यांन केलेय. जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

संबंधित बातम्या:

Farmer Protest : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी ‘गुलाबी गँग’ मैदानात

मोठी बातमी: शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद; गृहमंत्रालयाचे आदेश

(BJP MLA Surendra Singh will go on fast against BJP MP Virendra Singh Mast)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली