नवी दिल्लीः भारतीय जनता पार्टी 26 नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिनापासून ते 6 डिसेंबर या कालावधीत देशभर “संविधान गौरव अभियान” राबवणार अहो. या अभियानात सर्व राज्यांच्या जिल्हा मुख्यालयात दौरे केले जाणार आहेत आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंग आर्य यांनी ही घोषणा केली आहे. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे, असं म्हटलं जातय.