AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DJ च्या गाण्यामुळे लग्नच झालं कॅन्सल, वधूने लग्नचं मोडलं… नेमकं काय झालं ?

वाजतगात वरात आली होती, थोड्याच वेळात लग्न लागणार होतं. पण तेवढ्यात असं काही झालं की भरमंडपातच लग्न मोडलं. एका कृतीमुळे वधूने ते लग्नच मोडण्याचा निर्णय घेतला. तिला सर्वांनी समजावण्याचाही प्रयत्न केला, पण तिने कोणाचही ऐकलं नाही. असं काय झालं त्या लग्नात...

DJ च्या गाण्यामुळे लग्नच झालं कॅन्सल, वधूने लग्नचं मोडलं... नेमकं काय झालं ?
डीजेच्या गाण्यामुळे लग्नचं मोडलंImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Nov 27, 2024 | 9:18 AM
Share

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एक अजब प्रकरण समोर यआलं आहे. तिथे डीजेच्या गाण्यावर वरातीतले लोक नाचत होते, मात्र अचानक असं काही घडलं की ते एकमेकांसोबतच भिडले. वरीतसोबत आलेल्या पाहुण्यांनी डीजेला एक गाणं वाजवायला सांगितलं, पण डीजेने ते गाणं वाजवलं नाही तेव्हा वरातीतल्या लोकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. घरातल्या लोकांशीची ते भिडले. वाद सुरू झाला. जिथे लग्न लागणार होतं तिथेच यामुळे मोठा गोंधळ सुरू झाला. मात्र वधूला ही गोष्ट समजताच तिने जो निर्णय घेतला त्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. वधूने ते लग्नच मोडण्याचं ठरवलं आणि वराला त्याची वरात परत घेऊन जाण्यास सांगितलं.

तिचा निर्णय ऐकून घरातलेही हैराण झाले, सर्वांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण वधू तिच्या निर्णयावर ठाम होती, तिने लग्न करण्यास थेट नकार दिला. हे सगळं अजब प्रकरण निगोहा येथील भद्दी खेडा गावातील आहे. तेथे 25 नोव्हेंबर रोजी रायबरेलीच्या बछरांवा इचौली गावातून लग्नाची वरात आली होती. वधू छान तयार होऊन तिच्या वराची वाट पहात होती. मात्र तेवढ्यात वरातीमध्ये डीजेवरून गाण वाजवण्याच्या मुद्यावरून वाद झाला.

वराच्या जीजूंची डिमांड

मिळालेल्या माहितीनुसार, वराचा जीजूही त्याच्या लग्नाच्या वरातीत सामील होऊन नाचत होता, धमाल करत होता. त्याने डीजेला त्याच्या आवडीचं एक गाणं वाजवण्यास सांगितलं, पण डीजेवाल्याने काही ते गाणं वाजवलं नाही. फक्त माझ्या आवडीचंच गाण वाजेल असं उत्तर त्याने दिलं. हे पाहून वधूकडच्या लोकांनीही वराच्या जीजाजींना विरोधा केला आणि एवढ्याशा मुद्यावरूनच दोन्ही पक्ष एकमेकांना भिडले. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं, दोन्ही पक्षातील लोकांपैकी अनेक जण जखमी झाले.

वधूने घेतला असा निर्णय

अखेर थोड्या वेळाने हे प्रकरण शांत झालं. पण वधूला या सगळ्या वादाबद्दल, मारामारीबद्दल समजताच तीसुद्धा नाराज झाला. छोट्याशा मुद्यावरून वराकडच्या लोकांनी असा वाद घातल्याने तिला वाईट वाटलं आणि तिने थेट लग्न न करण्याचाच निर्णय घेतला. मात्र तिचं बोलणं ऐकून सर्वच जण हैराण झाले. लग्न मोडू नकोस असं सांगत अनेकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. घरातील मोठ्या, वडिलधाऱ्या मंडळींनीही तिची समजूत घातली, मात्र वधू तर कोणाचंच ऐकायला तयार नव्हती. छोट्याशा गोष्टीवरून ज्या घरात प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचतं, अशा घरात मी काही जाणार नाही असे सांगत ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. अखेर तिच्या निर्णयानंतर नवरा मुलगा हाँ वधूला सोबत न घेताच वरात घेऊन परतला.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.