AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Canada Issue | कॅनडा फुल बॅकफूटवर, मोदी सरकारच्या स्ट्राइकने ट्रूडो सरकार जमिनीवर

India vs Canada Issue | कॅनडाला आता कळलं भारतासोबतच्या संबंधांच महत्त्व. कॅनडाचे संरक्षण मंत्री बिल ब्लेयर यांच्या वक्तव्यावरुन हे स्पष्टपणे कळून आलं. हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरुन हा तणाव निर्माण झालाय.

India vs Canada Issue | कॅनडा फुल बॅकफूटवर, मोदी सरकारच्या स्ट्राइकने ट्रूडो सरकार जमिनीवर
justin trudeau-PM Modi
| Updated on: Sep 25, 2023 | 10:15 AM
Share

नवी दिल्ली : भारत सरकारच्या कठोर भूमिकेनंतर कॅनडाने गुडघे टेकले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची कॅनडामध्ये हत्या झाली होती. त्यावरुन जस्टिन ट्रूडो सरकारने भारत सरकारवर गंभीर आरोप केले होते. भारताचा या हत्येमध्ये सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे भारत-कॅनडामधील संबंध प्रचंड ताणले गेले. भारत सरकारने पुढील आदेशापर्यंत कॅनेडियन नागरिकांसाठी व्हिसा बंदी केली आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या डिप्लोमॅट्सवर कारवाई केली. त्यांना देश सोडण्याचा आदेश दिला. भारत-कॅनडामधील व्यापारी संबंधांवर या तणावाचा परिणाम होणार आहे. भारतातील काही उद्योजकांनी कॅनडामधील गुंतवणूक काढून घेतली. भारत सरकारने एकाचवेळी अनेक आघाड्यांवरुन हल्लाबोल केला. त्यामुळे कॅनडा सरकार चांगलच जेरीस आलय.

कॅनडातील जस्टिन ट्रूडो सरकार आता पूर्णपणे बॅकफूटवर आहे. त्यांनी भारतासमोर गुडघे टेकले आहेत. कॅनडाचे संरक्षण मंत्री बिल ब्लेयर यांच्या वक्तव्यावरुन हे स्पष्टपणे कळून आलं. भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत, असं बिल ब्लेयर यांनी म्हटलय. “भारताशिवाय इंडो-पॅसिफिकची रणनिती अपूर्ण आहे. कारण भारतामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात मजबुती मिळते. निज्जरच्या हत्येचा तपास सुरु राहील. पण त्याचवेळी इंडो-पॅसिफिक रणनीती करारावर काम सुरु राहील. भारतासोबतच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. पण कायद्याच आणि आपल्या नागरिकांच रक्षण करण्याची आमची जबाबदारी आहे” असं बिल ब्लेयर यांनी म्हटलय. इंडो-पॅसिफिक रणनीती आमच्यासाठी महत्त्वाची आहे, असं ब्लेयर यांनी सांगितलं. उलट भारतावरच आरोप

कॅनडामध्ये खलिस्तानची मागणी करणाऱ्यांना बळ दिलं जातं. तिथल्या भूमीवरुन भारतविरोधी कारवाया मोठ्या प्रमाणात चालतात. कॅनडामध्ये अनेक खलिस्तानी दहशतवाद्यांनी आश्रय घेतला आहे. या खलिस्तान स्रमर्थकांवर कारवाई करावी अशी भारत सरकारची मागणी आहे. पण कॅनडातील सरकार दोषींवर कारवाई करण्याऐवजी उलट भारतावरच आरोप करतय.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत