AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Canada Issue | कॅनडा फुल बॅकफूटवर, मोदी सरकारच्या स्ट्राइकने ट्रूडो सरकार जमिनीवर

India vs Canada Issue | कॅनडाला आता कळलं भारतासोबतच्या संबंधांच महत्त्व. कॅनडाचे संरक्षण मंत्री बिल ब्लेयर यांच्या वक्तव्यावरुन हे स्पष्टपणे कळून आलं. हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरुन हा तणाव निर्माण झालाय.

India vs Canada Issue | कॅनडा फुल बॅकफूटवर, मोदी सरकारच्या स्ट्राइकने ट्रूडो सरकार जमिनीवर
justin trudeau-PM Modi
| Updated on: Sep 25, 2023 | 10:15 AM
Share

नवी दिल्ली : भारत सरकारच्या कठोर भूमिकेनंतर कॅनडाने गुडघे टेकले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची कॅनडामध्ये हत्या झाली होती. त्यावरुन जस्टिन ट्रूडो सरकारने भारत सरकारवर गंभीर आरोप केले होते. भारताचा या हत्येमध्ये सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे भारत-कॅनडामधील संबंध प्रचंड ताणले गेले. भारत सरकारने पुढील आदेशापर्यंत कॅनेडियन नागरिकांसाठी व्हिसा बंदी केली आहे. दोन्ही देशांनी परस्परांच्या डिप्लोमॅट्सवर कारवाई केली. त्यांना देश सोडण्याचा आदेश दिला. भारत-कॅनडामधील व्यापारी संबंधांवर या तणावाचा परिणाम होणार आहे. भारतातील काही उद्योजकांनी कॅनडामधील गुंतवणूक काढून घेतली. भारत सरकारने एकाचवेळी अनेक आघाड्यांवरुन हल्लाबोल केला. त्यामुळे कॅनडा सरकार चांगलच जेरीस आलय.

कॅनडातील जस्टिन ट्रूडो सरकार आता पूर्णपणे बॅकफूटवर आहे. त्यांनी भारतासमोर गुडघे टेकले आहेत. कॅनडाचे संरक्षण मंत्री बिल ब्लेयर यांच्या वक्तव्यावरुन हे स्पष्टपणे कळून आलं. भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत, असं बिल ब्लेयर यांनी म्हटलय. “भारताशिवाय इंडो-पॅसिफिकची रणनिती अपूर्ण आहे. कारण भारतामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात मजबुती मिळते. निज्जरच्या हत्येचा तपास सुरु राहील. पण त्याचवेळी इंडो-पॅसिफिक रणनीती करारावर काम सुरु राहील. भारतासोबतच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. पण कायद्याच आणि आपल्या नागरिकांच रक्षण करण्याची आमची जबाबदारी आहे” असं बिल ब्लेयर यांनी म्हटलय. इंडो-पॅसिफिक रणनीती आमच्यासाठी महत्त्वाची आहे, असं ब्लेयर यांनी सांगितलं. उलट भारतावरच आरोप

कॅनडामध्ये खलिस्तानची मागणी करणाऱ्यांना बळ दिलं जातं. तिथल्या भूमीवरुन भारतविरोधी कारवाया मोठ्या प्रमाणात चालतात. कॅनडामध्ये अनेक खलिस्तानी दहशतवाद्यांनी आश्रय घेतला आहे. या खलिस्तान स्रमर्थकांवर कारवाई करावी अशी भारत सरकारची मागणी आहे. पण कॅनडातील सरकार दोषींवर कारवाई करण्याऐवजी उलट भारतावरच आरोप करतय.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.