AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Toll Tax: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता या लोकांना लागणार नाही टोल टॅक्स

Toll Tax: देशभरात जीएनएसएस प्रणाली लागू करण्यात आली नाही. सध्या ही प्रणाली पायलट प्रोजेक्ट आहे. कर्नाटक आणि हरियाणामध्ये ती लागू केली आहे. या पायलट प्रोजेक्टच्या यशानंतर ही प्रणाली देशभर लागू होणार आहे.

Toll Tax: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता या लोकांना लागणार नाही टोल टॅक्स
Toll Tax
| Updated on: Nov 17, 2024 | 10:03 AM
Share

Highways Toll Tax Free: केंद्र सरकारने टोल टॅक्ससंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा कोट्यवधी लोकांना होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने टोल टॅक्ससंदर्भात नवीन नियमावली केली आहे. त्यानुसार 20 किमीपर्यंत टोल रस्त्यांचा वापर करणाऱ्यांना वाहनधारकांना टोल लागणार नाही. त्यासाठी त्यांच्या वाहनावर ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (जीएनएसएस) हवी आहे. हा नियम संपूर्ण देशात लागू झाला आहे. जीएनएसएस असणाऱ्या वाहनधारकांनाच ही सुट मिळणार आहे.

20 किलोमीटरपर्यंत फायदा

रस्ते परिवहन मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाचा वापर करणाऱ्या खासगी वाहनधारकांना टोलमधून सुट दिली आहे. महामार्गावर 20 किलोमीटरपर्यंत वाहन चालवणाऱ्यांना ही सूट असणार आहे. त्यासाठी त्यांच्या वाहनांवर जीएनएसएस सुरु असायला हवी. 20 किलोमीटर पेक्षा जास्त टोल रस्त्याचा वापर करणाऱ्यांना त्या अंतराच्या आधारावर टोल लागणार आहे.

काय आहे जीएनएस प्रणाली

ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) हे महत्वाचे तंत्रज्ञान आहे. ते Google मॅप्स आणि इतर संचार प्रणालीसारखे मोबाइल नेव्हिगेशन एप्लिकेशनमध्ये काम येते. टोल घेण्यासाठी देशात या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी फास्टॅगसोबत ग्वोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट प्रणाली लागू केली. या निर्णयाचा फायदा टोल प्लॉझाच्या जवळपास राहणाऱ्या लोकांना होणार आहे.

GNSS प्रणाली सध्या पायलट प्रोजेक्ट

देशभरात जीएनएसएस प्रणाली लागू करण्यात आली नाही. सध्या ही प्रणाली पायलट प्रोजेक्ट आहे. कर्नाटक आणि हरियाणामध्ये ती लागू केली आहे. या पायलट प्रोजेक्टच्या यशानंतर ही प्रणाली देशभर लागू होणार आहे. केंद्र सरकार आता टोल प्रणालीमध्येही मोठ्या प्रमाणावर सुधारणा आणत आहे. जितके अंतर तुम्ही प्रवास करणार तितकाच टोल आता लागणार आहे. त्यामुळे टोलमध्ये पारदर्शकता येणार आहे. त्यामुळे टोल प्लॉझावर लांबच्या लांब रांगाही लागणार नाही.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.