AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर चीनची प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले परराष्ट्र मंत्री?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटले होते की, भारतासोबत चीनचे संबंध हे चीनसाठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर चीनची प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले परराष्ट्र मंत्री?
india vs china
shailesh musale
shailesh musale | Updated on: Apr 11, 2024 | 9:59 PM
Share

India-china Relation : चीन आणि भारत यांच्यातील संबंध सध्या हवे तितके चांगले नाहीये. चीन आपल्या विस्तारवादी विचारांमुळे शेजारील देशांच्या जागा हडप करण्याच्या प्रयत्नात असतो. त्यातच आता चीनने म्हटले की, मजबूत आणि स्थिर संबंध दोन्ही देशांच्या समान हितासाठी काम करतात, असे चीनने गुरुवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेवर चीनने ही प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, चीनचे भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत.

काय म्हणाले पीएम मोदी?

‘न्यूजवीक’ या अमेरिकन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदी म्हणाले होते की, दोन्ही देशांनी सीमेवर दीर्घकाळापासून सुरू असलेली परिस्थिती तात्काळ सोडवली पाहिजे. राजनैतिक आणि लष्करी पातळीवर द्विपक्षीय चर्चेद्वारे दोन्ही देशांनी सीमेवर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित केले पाहिजेत.

गुरुवारी पत्रकार परिषदेत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांना मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा त्या म्हणाल्या की, चीनने पंतप्रधानांच्या वक्तव्याची दखल घेतली आहे. आमचा विश्वास आहे की चीन आणि भारत यांच्यातील मजबूत आणि स्थिर संबंध दोन्ही देशांचे समान हित साधतात. प्रादेशिक शांतता आणि विकासासाठी हे महत्त्वाचे आहे.

भारतासोबतच्या संबंधावर काय म्हणाला चीन

माओ निंग म्हणाले की, जोपर्यंत सीमेचा संबंध आहे, तो संपूर्ण भारत-चीन संबंधांचे प्रतिनिधित्व करत नाही. द्विपक्षीय संबंधांमध्ये हे योग्यरित्या ठेवले पाहिजे आणि योग्यरित्या सोडवले पाहिजे. दोन्ही बाजू राजनैतिक आणि लष्करी माध्यमातून जवळच्या संपर्कात आहेत.

चीनने केलेल्या सीमा उल्लंघनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली प्रतिक्रिया अप्रभावी आणि कमकुवत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पोस्ट केले की, ‘पंतप्रधानांना चीनला कडक संदेश देण्याची संधी होती. त्यांच्या कुचकामी आणि कमकुवत प्रतिसादामुळे चीनला भारतीय भूभागावर आपला दावा सांगण्यास आणखी प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे.’

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?