AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वोच्च न्यायालय आणि विधिमंडळाच्या अधिकारावर सरन्यायाधीशांचं मोठं विधान; म्हणाले…

सरन्यायााधीश धनंजय चंद्रचूड काल दिल्लीत एका कार्यक्रमात होते. यावेळी त्यांनी न्यायपालिका आणि विधिमंडळावर भाष्य केलं. न्यायपालिकेचा निर्णय विधिमंडळाला फेटाळता येणार नाही. त्यांना फार फार त्रुटी दूर करता येईल, असं परखड मत सरन्यायाधीशांनी व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी न्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीवरही मोठं भाष्य केलं आहे.

सर्वोच्च न्यायालय आणि विधिमंडळाच्या अधिकारावर सरन्यायाधीशांचं मोठं विधान; म्हणाले...
DY ChandrachudImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 05, 2023 | 4:26 PM
Share

नवी दिल्ली | 5 नोव्हेंबर 2023 : सर्वोच्च न्यायालय आणि विधिमंडळाला घटनादत्त अधिकार मिळालेले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार मोठे की विधिमंडळाचे अधिकार मोठे यावर नेहमीच चर्चा होत असते. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निमित्ताने हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला होता. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचं एक मोठं विधान आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विधीमंडळाला नाकारता येत नाही. पण उणीवा दूर करण्यासाठी विधिमंडळ नवीन नियम बनवू शकतं, असं परखड मत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केलं आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड एका कार्यक्रमाला आले होते. यावेळी त्यांनी हे परखड मत व्यक्त केलं. आम्हाला निर्णय चुकीचा वाटतो म्हणून तो आम्ही नाकारतो, असं विधिमंडळाला अजितबात म्हणता येत नाही. न्यायालयाचा निर्णय विधीमंडळ थेट रद्द करू शकत नाही. पण उणीवा दूर करण्यासाठी नवीन नियम बनवू शकतं, असं धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

त्याचा विचार करत नाही

जनता न्यायाधीशांना निवडून देत नाही. त्यामुळे आम्ही जनतेला उत्तदायी नाही. तर आम्ही घटनेशी बांधिल आहोत. विधिमंडळातील प्रतिनिधी हे जनतेतून निवडून आलेले असतात. त्यामुळे ते जनतेला उत्तरदायी असतात. कोणताही निर्णय देताना आम्ही घटनात्मक नैतिकता पाळतो. सार्वजनिक नैतिकता नाही. एखादा निर्णय देताना समाजाकडून त्यावर प्रतिक्रिया येईल याचा न्यायालय विचार करत नाही. कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यात हाच मूलभूत फरक आहे, असंही चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

हे सत्यच आहे

न्यायाधीशांना लोक निवडून देत नाही. हे सत्य आहे. ही न्यायपालिकेची कमकुवत बाजू नाही. तर ही न्यायपालिकेची ताकद आहे. त्यामुळेच कोणताही निर्णय देताना आम्ही जनतेला उत्तरदायी नसतो. आम्ही फक्त संविधानाशी बांधील राहून निर्णय घेत असतो, असं चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं.

एखादा निर्णय चुकीचा वाटतो म्हणून विधिमंडळ सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळून लावू शकत नाही. विधिमंडळाला असं करण्याचा अधिकार नाही. त्यासाठी कायदा बनवून त्रुटी दूर केली जाऊ शकते, असं त्यांनी सांगितलं. कर क्षेत्रात साधारणपणे असं घडतं. कृत्यांचा स्वीकार करणं पूर्णपणे योग्य आहे. मात्र, एखादा निर्णय थेट नाकारणं योग्य नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

न्यायाधीशांनी…

न्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीवरही त्यांनी भाष्य केलं. न्यायाधीशांनी सेवानिवृत्त झालं पाहिजे. येणाऱ्या पिढ्यांना जबाबदारी सोपवणं महत्त्वाचं आहे. भूतकाळातील त्रुटी दूर करण्यासाठी आणि समाजाच्या विकासासाठी सामाजिक कायदेशीर ढाचा तयार करण्यासाठी हे आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....