AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर ‘हे’ पक्ष घालणार बहिष्कार; विरोधकांनी का घेतली आहे टोकाची भूमिका…

लोकसभा सचिवालयातून समोर आले की, 18 मे रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. बिर्ला यांनी पंतप्रधान मोदींना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले आहे.

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर 'हे' पक्ष घालणार बहिष्कार; विरोधकांनी का घेतली आहे टोकाची भूमिका...
| Updated on: May 24, 2023 | 8:12 PM
Share

नवी दिल्ली : देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत असताना पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या बहिष्काराच्या घोषणेनंतर आता 28 मे रोजी होणाऱ्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभातून काँग्रेसह 19 राजकीय पक्ष बहिष्कार टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाचे नेते पक्षांतर्गत चर्चा करत असून लवकरच त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमावर काँग्रेस बहिष्कार टाकू शकते. असे झाले तर उद्घाटन सोहळ्यात काँग्रेसचा एकही नेता उपस्थित राहणार नाही.

उद्घाटनाच्या घोषणेपासून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम,जनता दल (संयुक्त),आम आदमी पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी), समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, इंडियन युनियन मुस्लीम लीग,झारखंड मुक्ती मोर्चा,नॅशनल कॉन्फरन्स, केरळ काँग्रेस (मणि), रिव्हल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी,विदुथलाई चिरुथैगल कच्छी,मारूमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम, राष्ट्रीय लोक दल या 19 राजकीय पक्षांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

आम आदमी पक्षाकडूनही मंगळवारी संध्याकाळी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पक्षाच्यावतीने अधिकृत निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रपतींना उद्घाटन समारंभाला का बोलावले जात नाही, असा सवाल उपस्थित करुन विरोधकांनी हा निर्णय घेतला आहे.

तृणमूल काँग्रेसच्या वतीने राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी सोशल मीडियावरुन सांगितले आहे की, तृणमूल नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार नाही.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्व काही ‘मी’, माझे आणि मी एवढ्यावरच त्यांनी जोर लावला आहे.

त्यामुळे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे की, संसद भवन ही केवळ इमारत नसून ती परंपरा, मूल्ये, आदर्श आणि नियम यांची स्थापना असल्याचेही मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

लोकसभा सचिवालयातून समोर आले की, 18 मे रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. बिर्ला यांनी पंतप्रधान मोदींना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले आहे.

हे वृत्त समोर आल्यापासून विरोधी पक्षनेते सातत्याने मोदींवरून विरोध केला जात आहे. उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी राष्ट्रपतींना का बोलावण्यात आले नाही? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.