AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी-शाह स्वप्नपूर्तीच्या आणखी जवळ, पुदुचेरी ‘काँग्रेसमुक्त’; भारतात आता किती काँग्रेसशासित राज्य उरली?

सध्याच्या घडीला देशातील केवळ पाच राज्यांमध्येच काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. | Puducherry Floor Test

मोदी-शाह स्वप्नपूर्तीच्या आणखी जवळ, पुदुचेरी 'काँग्रेसमुक्त'; भारतात आता किती काँग्रेसशासित राज्य उरली?
सहा आमदारांनी पक्षाला रामराम ठोकल्याने अल्पमतात आलेले पुदुचेरीतील काँग्रेस आणि द्रमुक आघाडीचे सरकार अखेर सोमवारी कोसळले.
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Feb 22, 2021 | 2:42 PM
Share

मुंबई: सहा आमदारांनी पक्षाला रामराम ठोकल्याने अल्पमतात आलेले पुदुचेरीतील काँग्रेस (Congress) आणि द्रमुक आघाडीचे सरकार अखेर सोमवारी कोसळले. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी (V Narayanasamy) यांना सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. त्यामुळे काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य गेले आहे. (Puducherry floor test Narayanasamy government fails to prove majority)

त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ‘काँग्रेसमुक्त भारत’ या स्वप्नाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. सध्याच्या घडीला देशातील केवळ पाच राज्यांमध्येच काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड या पाच राज्यांमध्येच काँग्रेस सत्तेत आहे. यापैकी पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगढमध्येच काँग्रेस स्वबळावर सत्तेत आहे. तर महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काँग्रेस पक्ष हा दुय्यम भूमिकेत आहे. त्यामुळे या दोन राज्यांतील परिस्थिती बदलल्यास काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोदी-शाह जोडगोळीचा संकल्प आगामी काळात खरा ठरण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही.

पुदुचेरीत काँग्रेस पुन्हा सत्तेत येणं अवघड?

पुदुचेरीत काँग्रेसचे सरकार कोसळले असले तरी एप्रिल-मे महिन्यात याठिकाणी पुन्हा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, या निवडणुकांमध्ये पुन्हा सत्तेत येणे काँग्रेससाठी अवघड बाब मानली जात आहे.

दिल्लीतील भाजपच्या चाणक्यांकडून पुदुचेरीची सत्ता मिळवण्यासाठी अगदी शांतपणे आणि विचारपूर्वक पावले टाकण्यात आली आहेत. आतापर्यंत काँग्रेसचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी नायब राज्यपाल किरण बेदी यांच्या दडपशाहीचा मुद्दा उपस्थित करुन वेळोवेळी सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपने किरण बेदी यांना नायब राज्यपाल पदावरुन दूर केल्याने काँग्रेसच्या हातातील हुकमी मुद्दाच काढून घेतला आहे.

तमिलसाई सुंदरराजन यांच्याकडे राज्यपालपद देण्याचा मास्टरस्ट्रोक

किरण बेदी यांच्याकडून पुदुचेरीच्या नायब राज्यपालपदाची सूत्रे काढून घेतल्यानंतर ही जबाबदारी तमिलसाई सुंदरराजन यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांच्याकडे सध्या तेलंगणाच्या राज्यपालपदाची जबाबदारीही आहे. मात्र, त्यांच्यावर पुदुचेरीची अतिरिक्त जबाबदारी देऊन भाजपने मास्टरस्ट्रोक खेळल्याची चर्चा आहे.

कारण तमिलसाई सुंदरराजन यांचे मूळगाव तामिळनाडूत आहे. पुदुचेरीतही तामिळ भाषिक मतदार आहेत. व्ही. नारायणस्वामी यांच्याप्रमाणे टी. सुंदरराजन यादेखील नाडर समाजाच्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत या गोष्टी भाजपसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

संबंंधित बातम्या:

मोठी बातमी: पुदुचेरीत काँग्रेसला मोठा धक्का; व्ही. नारायणसामींचे सरकार बहुमत चाचणीत अपयशी

(Puducherry floor test Narayanasamy government fails to prove majority)

Follow Us
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?