AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सीमाप्रश्न पेटवला गेला ते अत्यंत चुकीचं”; काँग्रेस नेत्याचा भाजपवर घणाघात

ज्या पद्धतीने सीमावाद ज्या पद्धतीने पेटवला गेला ते मात्र अत्यंत चुकीचं असल्याचे परखड मत काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी मांडले

सीमाप्रश्न पेटवला गेला ते अत्यंत चुकीचं; काँग्रेस नेत्याचा भाजपवर घणाघात
| Updated on: Dec 09, 2022 | 6:46 PM
Share

मुंबईः सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केल्यानंतर सीमावादाची नव्याने ठिणगी पडली. त्यानंतर दोन्ही राज्यातून असंतोष व्यक्त करण्यात येऊ लागला. वाद वाढल्याने सीमावादात केंद्रानं हस्तक्षेप करावा अशीही मागणी करण्यात येऊ लागली. हा वाद आणखी पेटू लागल्याने शिंदे-फडणवीस सरकारविरोधात राज्यातून जोरदार टीका होऊ लागली. त्यात आता काँग्रेसनेही उडी घेत भाजपवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी या प्रश्नावर बोलताना त्यांनी थेट भाजपवर टीका केली आहे. यावर बोलताना म्हणाले की, महारष्ट्रातील खासदारांनी यापूर्वीच केंद्राकडे भेटण्यासाठी वेळ मागितली होती.

मात्र ज्या पद्धतीने सीमावाद ज्या पद्धतीने पेटवला गेला ते मात्र अत्यंत चुकीचं असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे.

तर कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने या प्रकरणावर ज्या प्रकारे बोलत आहेत, तेही चुकीचं असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र-कर्नाटक या वादावर बोलताना काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच्याकडून नेहमी वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत.

त्यामुळे बोमई हे त्यांच्याच पक्षात आहेत. त्यामुळे त्यांना समजून सांगणं आणि मध्यस्थी करणं गरजेचं असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेत असंतोष पसरत आहे.

त्याचवेळी बाळासाहेब थोरात यांनी गुजरात निवडणुकीविषयीही सांगितले. यावेळी गुजरात निवडणुकीचे विश्लेषण करताना म्हणाले की, भाजपच्या विजयात आपचा वाटा मोठा आहे.

त्यांचा फटका काँग्रेसला बसला आहे. विरोधी पक्ष म्हणून एकत्र येणे काळाची गरज आहे पण ते समजून घेणंही गरजेचं असल्याचेही त्यांनी सांगितले.

ईडीच्या कारवाईवर बोलताना त्यांनी भाजपची पोलखोलही केली. ईडीकडून नेत्यांवर केली गेलेली कारवाईबाबत सांगितले की, लहान मुलांना जरी विचारलं तरी ईडीचं राजकारण त्यांच्या लक्षात आले आहे, ईडीसारख्या संस्थांचा राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा ठपका त्यांनी भाजपवर ठेवला आहे.

भाजप मंत्री आणि पदाधिकारी यांचं वागणं बोलणं अत्यंत चुकीचं आहे. संजय राउताना भाजपचे लोक पुन्हा आत घालायला निघाले आहेत का.? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.