AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चर्चा काँग्रेस अध्यक्षपदाची; पण खर्गेंनी सगळ्यांची कुंडलीच मांडली…

मल्लिकार्जुन खर्गेंनी टीका करणाऱ्या पक्षांतर्गतील नेत्यांना आणि बाहेरच्या नेत्यांनाही म्हणाले मी आज इथे आहे ते संघर्षाचं फळ आहे.

चर्चा काँग्रेस अध्यक्षपदाची; पण खर्गेंनी सगळ्यांची कुंडलीच मांडली...
| Updated on: Oct 13, 2022 | 7:04 PM
Share

नवी दिल्लीः मागील गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची (Congress President Election 2022) आणि उमेदवारांची जोरदार चर्चा सुरु आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी आपल्यावर केल्या जाणाऱ्या आरोपाबद्दल आणि पक्षांतर्गत राजकारणाबद्दल त्यांनी आपली भूमिका टीव्ही नाईनकडे स्पष्ट करताना अनेक मुद्यांन हात घालत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी बोलताना सांगितले की, जे मला गांधी घराण्याचा (Gandhi Family) रबर स्टॅम्प म्हणत आहेत, ते गांधी घराण्याबरोबरच माझाही अपमान करत असल्याची खंत बोलून दाखवली. मी जर अध्यक्ष झाल्यानंतर मी गांधी घराण्याच्या इशाऱ्यावर काम करणार असल्याची टीका केल जात आहे.

मात्र त्यांनी आपला राजकीय संघर्ष सांगत ते म्हणाले की, इतकी वर्षे संघर्ष करून मी राजकारणात आलो आहे. मी अगदी ट्रेड युनियनपासून सुरुवात करुन या स्थानापर्यंत पोहचलो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी गांधी घराण्याविषयी बोलताना सांगितले की, गांधी घराणे हे काँग्रेस पक्षाचा भाग आहेत.

सोनिया गांधींना अध्यक्षपदाचा 20 वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे मी त्यांचे मार्गदर्शन घेईनच. पक्ष वाढीसाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी भाजपबरोबर टक्कर देत आहेत.

त्याबरोबरच शशी थरूर यांच्या पक्षांतर्गत बदलाच्या गोष्टीबद्दलही त्यांनी स्पष्ट केले, ते म्हणाले की, थरुर पक्षांतर्गत बदलासाठी ते गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. त्यातच आता जर ते बदलाबाबत बोलत असतील तर मात्र त्याची आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले.

खर्गे आणि थरुर खुल्या चर्चेसाठी तयार आहेत का असा सवाल केल्यानंतर खर्गे स्पष्ट शब्दातच सांगितले की, हा लढा पक्षांतर्गत नाहीच मुळी. आमचा लढा आहे तो भाजपसोबत, आणि त्यांच्यासोबत आम्ही एकमुखाने लढणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपबरोबर आमचा लढा आम्ही सुरुच ठेवणार आहे.

भाजपबरोबर मी संसदेतही वाद घालतो असं सांगत शथी थरुर हे मला माझ्या लहान भावासारखे असल्याचे सांगत आम्ही भाजपबरोबरचा लढा आणखी तीव्र करणार असंही त्यांनी सांगितले.

काँग्रेसमधील ज्या नेत्यांनी पक्ष सोडला त्यांनी राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले. तशी तक्रार सोनिया गांधींकडेही करण्यात आली.

त्यावर बोलताना ते म्हणाले की, जम्मू काश्मिरच्या आझादांनी पक्षात फूट पडल्याचाही आरोप केला होता, मात्र ज्या ईडीची भीती होती, ते पक्षाला सोडून गेले असल्याचेही त्यांनी सांगितले.

कर्नाटकातील हिजाब प्रकरणावर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला. त्यावरुन त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपला समाजात फूट पाडण्याची सवय असून त्यासाठीच ते प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....