AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींचं फक्त काँग्रेस जोडो? जयराम रमेशांची 5 वक्तव्यं विरोधकांची एकजूट उधळून लावणारी..!

राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास सुरू केला आहे. जसजसा राहुल यांचा हा प्रवास पुढे सरकत आहे, तसतसे विरोधकांच्या एकजुटीलाही तडे जात आहेत.

राहुल गांधींचं फक्त काँग्रेस जोडो? जयराम रमेशांची 5 वक्तव्यं विरोधकांची एकजूट उधळून लावणारी..!
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Sep 16, 2022 | 5:52 PM
Share

नवी दिल्लीः आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) काँग्रेसला उभारी देण्यासाठी राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर प्रवासाला सुरुवात केली आहे. काँग्रेसची ही ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) असल्याने विरोधकांच्या एकजुटीला मात्र तडे जात आहेत. या काळात काँग्रेसला कोणीही कमकुवत करण्यासाठी विरोधक एकजूट होऊ शकत नाही, असे म्हणत काँग्रेसने (Congress) टीएमसी, सीपीएम आणि आम आदमी पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

त्यामुळे या परिस्थितीत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे रूपांतर आता विरोधी तोडो यात्रेत तर होणार नाही ना असाही सवालही उपस्थित केला जात आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारत जोडो यात्रा ही विरोधकांच्या एकजुटीची यात्रा नाही, तर भारत जोडो यात्रा म्हणजे काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा प्रवास असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

त्यामुळे काँग्रेस पक्ष मजबूत केल्याशिवाय विरोधकांच्या ऐक्याची कल्पनाही होऊ शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ज्या राजकीय पक्षाला काँग्रेससोबत युती करायची आहे. त्यांनी काँग्रेसकडून सर्व राजकीय घ्यायचे आणि काँग्रेसला काहीही द्यायचे नाही, असा विचार करू नये असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

या राजकीय प्रवासात काँग्रेसला कमकुवत करण्याचा सर्वांनीच प्रयत्न केला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

जयराम रमेश म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या वाढीसाठी ममता बॅनर्जींची टीएमसी कारणीभूत आहे, तर केरळमध्ये सीपीएम आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

सीपीएमकडून टीका केल्यानंतरच जयराम रमेश यांचे हे विधान केले आहे. त्यानंतर डाव्या पक्षानी राहुल गांधी केरळ राज्यात जास्त दिवस घालवत असून त्यांची गरज उत्तर प्रदेशात आहे असं ट्विट त्यांच्याकडून केले गेले आहे.

केरळमध्ये काँग्रेस आणि डावे एकमेकांविरोधात आहेत. तर राहुल गांधी केरळचे खासदार असल्याने आजकाल ते भारत जोडो यात्रेअंतर्गत केरळमध्येच पदयात्रा काढत आहेत.

त्यामुळे सीपीएम पक्ष चिंताग्रस्त आहे. राहुल गांधी यांच्यामुळे मात्र काँग्रेस आणि डावे यांच्यामध्ये आता शाब्दिक चकमक वाढली आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या विरोधी पक्षातील नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

याच काळात ही भारत जोडो यात्रा निघालेली आहे. आणि देशातील विरोधी पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधात तगडी झुंज देण्यासाठी एकत्र आले आहेत.

सोनिया गांधी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर नितीश कुमार पुन्हा दिल्लीत येणार आहेत. मात्र त्याआधीच त्यांनी विरोधी गटातील डझनभर नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत.

त्यानंतर ते पाटण्याला परतले आहेत. तर त्याच वेळी, ममता बॅनर्जी यांचा अजेंडा स्पष्ट आहे की 2024 मध्ये नितीश कुमार, हेमंत सोरेन आणि अखिलेश यादव यांच्यासारखे पक्ष एकत्र आघाडी तयार करणार आहेत

विरोधकांची मोट बांधल्याशिवाय 2024 च्या निवडणुकीत भाजपला आव्हान देता येणार नाही, हे काँग्रेसला चांगलेच ठाऊक आहे. केवळ काँग्रेसच नाही तर जेडीयूनेही हे संकेत दिले आहेत.

जेडीयूचे सरचिटणीस केसी त्यागी यांनी यापूर्वी म्हटले होते की, काँग्रेस आणि डाव्यांशिवाय भाजपविरोधात जोरदार लढा देता येणार नाही. त्यामुळे विरोधी पक्षांना मतभेद मिटवून एकत्र यावे लागेल.

भाजप आणि मोदी सरकारविरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी राहुल गांधी सध्या ‘भारत जोडो यात्रा’ करत आहेत. त्यामुळे विरोधकांचे एकजुटीचे सगळे डाव धुळीस मिळत आहेत.

काँग्रेसची लढाई भाजपसोबत आहे की विरोधी पक्षांशी, असा सवालही सीपीएमने उपस्थित केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही यात्रा यूपीएचे नसून काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ असल्याचे सांगितले आहे.

भारत जोडो यात्रा ही देशातील जनतेला एकत्र आणण्यासाठी आहे, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केले होते. या यात्रेतून विरोधी पक्ष एकजूट होण्यास मदत होईलही, पण तो त्याचा मुख्य उद्देश नव्हता हेही स्पष्ट झाले आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप