AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना वाढवतोय चिंता, रुग्णांच्या संख्येत गेल्या 7 महिन्यातील सर्वात मोठी वाढ

देशात कोरोनाने पुन्हा एकदा पाय पसरायला सुरुवात केली आहे. अनेक जिल्हे आणि राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

कोरोना वाढवतोय चिंता, रुग्णांच्या संख्येत गेल्या 7 महिन्यातील सर्वात मोठी वाढ
Image Credit source: TV9 Network
shailesh musale
shailesh musale | Updated on: Apr 06, 2023 | 12:20 PM
Share

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये आता झपाट्याने वाढ होताना दिसतेय. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोविड 19 चे विक्रमी 5,335 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे सक्रीय रुग्णांची संख्या ही 25,587 वर पोहोचली आहे. गेल्या अनेक दिवसानंतर देशात एकाच दिवसात 5000 हून अधिक कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ज्यामुळे चिंता वाढल्या आहेत. सरकारही यावर नजर ठेवून आहे.

बुधवारी कोरोनाचे 4435 नवीन रुग्ण वाढले होते. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने अनेक राज्यांच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्याही वाढली आहे. पण दुसरीकडे कोविड लसीचा अभाव चिंतेचा विषय बनला आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने कोरोनावरील लसीची मागणीही वाढली आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीचा तुटवडा आहे. यूपी, बंगालसह अनेक राज्यांमधील सरकारी रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध नाही. हिमाचल, जम्मू, पंजाब आणि बिहारमध्येही लसींचा तुटवडा जाणवत आहे.

देशात 23 सप्टेंबर रोजी 5,383 रुग्ण वाढले होते. त्यानंतर आज ही संख्या ५ हजारांच्या वर गेली आहे. 13 जणांचा देशात मृत्यू झाला आहे. यापैकी कर्नाटक आणि महाराष्ट्रात प्रत्येकी दोन तर केरळ-पंजाबमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. केरळनेही सात जुन्या मृत्यूंची यादी अपडेट केली आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत 5 लाख 30 हजार 929 लोकांनी आपला जीव गमावला आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत देशात एकूण पाच लाख 30 हजार 916 मृत्यू झाले आहेत. INSACOG ने सांगितले की, नवीन व्हेरिएंट देशातील 38 टक्के संसर्गाच्या प्रसारासाठी जबाबदार आहे.

INSACOG च्या मते, विषाणूचा एक नवीन प्रकार, XBB.1.16, भारताच्या विविध भागांमध्ये आढळून आला आहे, आजपर्यंत त्याचे 38.2% संक्रमण आढळले. गेल्या मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये एक्सबीबी फॉर्म सर्वाधिक आढळून आला आहे. देशाच्या काही भागांमध्ये, BA.2.10 आणि BA.2.75 उपप्रकार देखील आढळून आले, जे XBB प्रमाणेच, Omicron स्वरूपातून घेतलेले आहेत.

देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये संसर्ग वेगाने वाढला आहे, परंतु येथे रूग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढलेली नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत, ज्यांना घरी एकटे राहण्याचा सल्ला दिला जात आहे. ज्या लोकांना आधीच इतर आजार आहेत, त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे निश्चितपणे मध्यम ते गंभीर स्थितीत नोंदवली जात आहेत.

Follow Us
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप