AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंधन संकट एका झटक्यात संपलं, पुन्हा सुरळीत होणार गॅसचा पुरवठा, आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज

सध्या अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला असून, याचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत आहे. मात्र आता भारतासाठी मोठी गुडन्यूज समोर आली आहे.

इंधन संकट एका झटक्यात संपलं, पुन्हा सुरळीत होणार गॅसचा पुरवठा, आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी सर्वात मोठी गुडन्यूज
LPG gas supplyImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 11, 2026 | 7:33 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा मोठा परिणाम हा इंधन पुरवठ्यावर झाला आहे. जगातील अनेक देशांना या युद्धामुळे इंधन टंचाईची झळ बसली आहे. भारताला देखील मोठा फटका बसला आहे. मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इराणने काही देशांसाठी विशेष: अमेरिका आणि अमेरिकेचे सहकारी देश आणि युरोपीयन देशांसाठी होर्मुजची सामुद्रधुनी बंद केली आहे. तर इतर देशांमधील तेल कंपन्यांनी हल्ला होण्याची भीती असल्यामुळे या मार्गाने तेल वाहतूक करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई जाणवत आहे. दरम्यान भारतामध्ये देखील गॅसचा प्रचंड प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी गॅस नसल्यामुळे हॉटेल बंद ठेवण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर आली आहे. मात्र आता एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे भारताचं इंधन संकट दूर होणार आहे. याबाबत सरकारकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नॅचलर गॅसचे दोन मोठे कार्गो लवकरच भारतामध्ये येत आहेत. पेट्रोलियम आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी याबाबत माहिती दिली आहे. नॅचरल गॅसचे दोन मोठे कार्गो लवकरच भारतामध्ये पोहोचत आहे, कच्च्या तेलाचा पुरवठा देखील सुरळीत आहे, असं यावेळी सुजाता शर्मा यांनी म्हटलं आहे. पुढे बोतलाना त्या म्हणाल्या की, ओएमसीकडून वेगवेगळ्या देशांमधून कच्चे तेल खरेदी केलं जात आहे. पूर्वी होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून भारतामध्ये 45 टक्के कच्च तेल यायचं तर इतर मार्गाने 55 टक्के कच्चे तेल यायचं. दरम्यान आता यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतात येणारं सुमारे 75 टक्के कच्चं तेल हे इतर मार्गाने येत आहे. तर होर्मुझ मार्गे केवळ 25 टक्केच कच्चे तेल भारातमध्ये येत आहे.

दरम्यान ग्राहकांनी गॅस सिलिंडच्या बुकिंगसाठी घाई करू नये, त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण होत आहे. गॅसचा तुटवडा होणार नाही याकडे सरकारचं लक्ष आहे. तसेच गॅस वितरणावर देखील विशेष लक्ष ठेवलं जात आहे. या जागतिक संकटाच्या काळात इंधन टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असंही यावेळी शर्मा यांनी म्हटलं आहे.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.