मोटार फिट करण्यासाठी विहिरीत उतरलेले तीन जण वर चढलेच नाही, विहिरीत नेमकं काय घडलं?

| Updated on: May 21, 2023 | 11:04 PM

खाली जाऊन बेशुद्ध पडला. श्वास गुदमरून सुरेंद्रचाही मृत्यू झाला. उतरत असताना विक्रमची प्रकृती खराब झाली. त्यामुळे तो तुरंत बाहेर आला.

मोटार फिट करण्यासाठी विहिरीत उतरलेले तीन जण वर चढलेच नाही, विहिरीत नेमकं काय घडलं?
Follow us on

हिसार : स्याडवा येथील नरेंद्र यांच्या विहिरीत दलदल होती. विहिरीत मोटार फिट करायची होती. जयपाल आणि विक्रम शेतात गेले. जयपाल दोरीच्या साह्याने विहिरीत उतरला. परंतु, विषारी वायूमुळे तो बेशुद्ध पडला. विक्रम जोराने ओरडला. तो पहिल्याला वाचवण्यासाठी गेला. सुरेंद्रही खाली उतरला. खाली जाऊन बेशुद्ध पडला. श्वास गुदमरून सुरेंद्रचाही मृत्यू झाला. उतरत असताना विक्रमची प्रकृती खराब झाली. त्यामुळे तो तुरंत बाहेर आला.

गावकरी एकत्र आले. त्यांनी दोरीच्या माध्यमातून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. तिसऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडचण आली. प्रशासकीय टीम घटनास्थळी आली. तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. संध्याकाळी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. तिघांवरही अंतीम संस्कार करण्यात आले.

 

हे सुद्धा वाचा

हरियाणातील हिसारमध्ये विहिरीत विषारी वायू लागल्याने तीन जणांचा मृ्त्यू झाला. चौथा व्यक्ती कसाबसा बाहेर पडला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. विहिरीची सफाई करत असताना ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनिक अधिकारी आणि अजारनगर ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले.

सुरेंद्र, जयपाल आणि नरेंद्र अशी मृतकांची नाव आहेत. विक्रमला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघांवरही आजच अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतकांचे वय ३० ते ३३ वर्षे आहे. घटनेनंतर गावात चूल पेटली नाही. अशीच घटना वर्षभरापूर्वी घडली होती. दोन शेतकरी विहिरीत मातीखाली दाबले गेले होते.

कुटुंबातील कमावते व्यक्ती गेले

तिन्ही मृतक हे घरातील कमावते व्यक्ती होते. सुरेश आणि जयपाल यांच्या आई-वडिलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला. ३३ वर्षीय सुरेशचे लहान-लहान मुलं आहेत. ३० वर्षीय जयपालला चार मुली आणि एक मुलगा आहे. ३२ वर्षीय नरेंद्रलाही दोन मुली आहेत. नरेंद्र यांच्या घरी त्याची आई दिव्यांग आहे.

एका वर्षापूर्वी २२ मे रोजी अशीच दुर्घटना घडली. विहीर खोदत असताना दोघांचा मृत्यू झाला होता. ही दुर्घटना रविवारी घडली होती. जयपाल हुड्डा आणि जगदीश फौजी यांचा मृत्यू झाला होता. ८० तासांनंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.