AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farming : बनू शकले नाही सरकारी अधिकारी, आता शेतीतून कमवतात २५ लाखांचे वार्षिक उत्पन्न

भाजीपाला लागवड सुरू करण्यापूर्वी त्यांनी प्रशिक्षण घेतले. आता ते आपल्या शेतात इजरायली गहू, ऑर्गेनिक गहू आणि काळा गहू उगवत आहेत.

Farming : बनू शकले नाही सरकारी अधिकारी, आता शेतीतून कमवतात २५ लाखांचे वार्षिक उत्पन्न
| Updated on: May 21, 2023 | 7:36 PM
Share

जयपूर : तंत्रज्ञानाचा वापर वाढला. व्यक्तीची जागा मशीन घेत आहेत. याचा परिणाम शेतीवर झाला आहे. शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघीतले जात आहे. शिकलेले युवक शेतीकडे वळत आहेत. सुशिक्षित लोकं भाजीपाला लागवड करत आहेत. यातून त्यांचे उत्पन्नही वाढले आहे. अशाच एका युवकाची ही कहाणी. भगवंत सिंह असे त्यांचे नाव. राजस्थानातील कोटा जिल्ह्यातील पीपल्दा गावचे रहिवासी. त्यांनी एलएलबीचे शिक्षण घेतले. आता ते व्यावसायिक पद्धतीने शेती करत आहेत.

भगवंत सिंह म्हणतात, त्यांना आरएएस अधिकारी बनायचं होतं. कित्तेक वेळा परीक्षाही दिली. परंतु, यश मिळालं नाही. एलएलबीचा अभ्यास केल्यानंतर वकिली सुरू केली. सोबतच ते गावात शेती करू लागले. भगवंत सिंह म्हणतात, सुरुवातीला ते पारंपरिक शेती करत होते. त्यातून उत्पन्न कमी मिळत होते.

भाजीपाला लागवड सुरू करण्यापूर्वी त्यांनी प्रशिक्षण घेतले. आता ते आपल्या शेतात इजरायली गहू, ऑर्गेनिक गहू आणि काळा गहू उगवत आहेत. यातून त्यांचा चांगला नफा मिळत आहे.

ऋतुनुसार लावतात भाजीपाला

भाजीपाला लागवडीवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. ऋतूनुसार ते वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला लावत आहेत. गोबी, टमाटर, शिमला मिर्ची, लवकी, खीरा, काकडी आणि वांगे यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला लागवड करतात. यातून त्यांना चांगला फायदा होत आहे.

त्यांच्या शेतात मजूर काम करतात. भगवत सिंह चांगल्या कमाईसोबत रोजगारही देत आहेत. भगवत सिंह २५ एकर जागेत पारंपरिक आणि आधुनिक शेती करत आहेत. यातून त्यांना वर्षाला २० ते २२ लाख रुपये उत्पन्न होत आहे. पिकांसाठी ड्रिपींग सिस्टमचा वापर ते करतात. यामुळे पाण्याची बचत होते.

शेणखताचा वापर

रासायनिक खताऐवजी ते शेणाचा खत म्हणून वापर करतात. भगवत सिंह यांना उत्कृष्ट शेती केली म्हणून कित्तेक पुरस्कार मिळाले आहेत. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी त्यांना आधुनिक शेती केल्याबद्दल सन्मानित केले होते.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.