AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दसरा, दिवाळीचे रेल्वे तिकिटाचे टेन्शन विसरा, तिकीट मिळणार फटाफट, कारण रेल्वे चालवणार 6000 स्पेशल ट्रेन

Special Trains List: 108 रेल्वेमध्ये अतिरिक्त जनरल कोच जोडले गेले आहे. 12,500 नवीन कोच बनवण्यास परवानगी दिली आहे. ते पुढील एक, दोन वर्षांत विविध ट्रेनला जोडले जाणार आहे. यावर्षी सणांमुळे आतापर्यंत 5,975 विशेष रेल्वे सोडणे निश्चित केले आहे.

दसरा, दिवाळीचे रेल्वे तिकिटाचे टेन्शन विसरा, तिकीट मिळणार फटाफट, कारण रेल्वे चालवणार 6000 स्पेशल ट्रेन
Railway
| Updated on: Sep 28, 2024 | 6:22 PM
Share

Special Trains List: दसरा आणि दिवाळीत गावी जाणाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळे या दिवसांचे तिकीट तीन महिन्याआधीच अनेक जण आरक्षित करुन ठेवतात. परंतु अनेकांना रेल्वेचे तिकीट मिळत नाही. त्यामुळे खूप जास्त पैसे भरुन खासगी बस वाहतुकीचा पर्याय निवडावा लागतो. आता भारतीय रेल्वेने या लोकांसाठी स्पेशल ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दसरा, दिवाळी आणि छट पुजासाठी स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहे. तब्बल 6000 स्पेशल ट्रेन रेल्वे चालवणार आहे.

मागील वर्षापेक्षा यंदा जास्त ट्रेन

भारतीय रेल्वेने रोज एक कोटीपेक्षा जास्त जण प्रवास करतात. रेल्वेने आगामी सण, उत्सव पाहून विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोंबर महिन्यात येणारा नवरात्र, दसर, नोव्हेंबर महिन्यात येणारी दिवाळी, छठ पूजा आणि नाताळच्या सुट्या यामुळे विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, यावर्षी सणांमुळे आतापर्यंत 5,975 विशेष रेल्वे सोडणे निश्चित केले आहे. मागील वर्षी या विशेष रेल्वेची संख्या 4,429 होती. या विशेष रेल्वेंमुळे एक कोटीपेक्षा जास्त लोकांना आपल्या घरी जाण्याची सुविधा मिळणार आहे.

108 रेल्वेमध्ये अतिरिक्त जनरल कोच

दुर्गा पूजा 3 ऑक्टोंबरपासून सुरु होत आहे. दिवाळी 31 पासून सुरु होणार आहे. 7 आणि 8 नोव्हेंबरला छठ पुजा होणार आहे. यामुळे विशेष ट्रेन सोडल्या जाणार आहे. मागणी वाढल्यास विशेष ट्रेनची संख्या वाढू शकते, असे रेल्वेच्या अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच 108 रेल्वेमध्ये अतिरिक्त जनरल कोच जोडले गेले आहे. 12,500 नवीन कोच बनवण्यास परवानगी दिली आहे. ते पुढील एक, दोन वर्षांत विविध ट्रेनला जोडले जाणार आहे.

रेल्वेने प्रवाशांसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेकांना रेल्वेत आरक्षित तिकीट मिळणार आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सला द्यावे लागणारे गडगंज भाड्यातून त्यांची सुटका होणार आहे. त्यांची आर्थिक बचत होणार आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.