तुम्हाला पण आहे का ही सवय? तर मग साप चावण्याचा धोका 50 टक्के अधिक वाढतो, ही चूक कधीही करू नका
साप हे कधीही स्वत:हून आपल्याला चावत नाहीत, मात्र त्यांना जर तुमचा धोका जाणवला किंवा तुम्ही बेसावध असाल तर तुम्हाला संर्पदंश होऊ शकतो, आपल्या काही सवयींमुळे देखील साप आपल्याला चावू शकतो.

सापांबद्दल जाणून घेण्याची अनेकांच्या मनात उत्सुकता असते, जसं की कोणात साप विषारी असतो? कोणता साप बिनविषारी असतो? वेगवेगळ्या सापांच्या विषाचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो. विषारी आणि बनिविषारी साप कसे ओळखायचे? असे एक न अनेक प्रश्न तुमच्या मनात असतात आणि या प्रश्नाची उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता असते. साप चावण्याचं किंवा ज्याला आपण सर्पदंश म्हणतो ते होण्याचं प्रमाण दोन ऋतूमध्ये सर्वाधिक असतं एक म्हणजे पावसाळा आणि दुसरा ऋतू म्हणजे उन्हाळा, त्यामुळे या काळात आपण सावध राहिलं पाहिजे. भारतामध्ये हजारो प्रजातीचे साप आढळतात, मात्र त्यातील अगदी काही थोडेच साप हे विषारी असतात.
परंतु साप चावल्यानंतर आपण अनेकदा खूप जास्त घाबरून जातो. त्यामुळे साप बिनविषारी असला तरी देखील त्या तणावाचा आपल्यावर परिणाम होऊ शकतो. कधी-कधी तणाव एवढा वाढतो की भीतीमुळे देखील आपला मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे साप चावला तर घाबरून जाऊ नका, तातडीने रुग्णाला डॉक्टरची मदत मिळून द्या. साप चावल्यानंतर इतर ठिकाणी कुठेही वेळ वाया घालू नका, ज्या वक्तीला साप चावला आहे, त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करा. जर तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला कधीही मारू नका, त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते या सापाला रेस्क्यू करतील.
अनेकदा असं होतं की आपल्याच सवयीमुळे आपल्याला साप चावण्याचा धोका वाढतो. जसं की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापाला तुमचे घराच्या बाहेर ठेवलेले बूट हे लपण्यासाठी अधिक सुरक्षित जागा वाटतात. त्यामुळे बुटातून साप बाहेर निघण्याच्या अनेक घटना घडत असतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे साप हा थंड रक्ताचा प्राणी आहे, त्यामुळे तो स्वत:चं टेंपरेचर स्वत: नियंत्रित करू शकत नाहीत. अशा अवस्थेमध्ये अति थंडी किंवा अति उन्हामध्ये त्याला तुमच्या बुटामध्ये नौसर्गिकरित्याआवश्यक असलेलं वातावरण निर्माण होतं. बुटामध्ये एक तर अंधार असतो, आणि वातावरण देखील संतुलीत असतं. योग्य वातावरण आणि लपण्यासाठी अंधार या दोन गोष्टी जूळून आल्यामुळे साप तुमच्या बुटात घुसून बसतो.
अनेकांना सवय असते ते काही न पहाता तसाच बूट पायात घालतात, त्यात जर साप असेल तर तुम्हाला सर्पदंश होऊ शकतो, त्यामुळे बूट घालण्यापूर्वी नेहमी एकदा तो स्वच्छ करून घ्यावा आणि मगच तो घालावा, त्यामुळे अशा धोक्यांपासून तुमचा बचाव होऊ शकतो, तुम्ही सुरक्षित राहू शकता.