AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Assembly Elections 2022: निवडणूक आयोगाने जाहीर सभांवरील बंदी उठवली, पाच राज्यात निवडणुकीचा जोर वाढणार

निवडणूकीसाठी खुल्या मैदानावर 1000 लोक सहभागी होऊ शकतील असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. तर कार्यालयीन बैठकीत 500 लोक एकत्र येऊ शकतात असेही त्यांनी सांगितले आहे.

Assembly Elections 2022: निवडणूक आयोगाने जाहीर सभांवरील बंदी उठवली, पाच राज्यात निवडणुकीचा जोर वाढणार
election commisioner .
| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 5:32 PM
Share

नवी दिल्लीः निवडणूकीसाठी खुल्या मैदानावर 1000 लोक सहभागी होऊ शकतील असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. तर कार्यालयीन बैठकीत 500 लोक एकत्र येऊ शकतात असेही त्यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे पाच राज्यातील निवडणुकांच्या घटनांना आता आणखी जोर वाढणार आहे. जाहीर सभांना निवडणूक आयोगानेच मान्यता दिल्याने राजकीय घडामोडींनी वेग येणार आहे. पाच राज्यातील निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाने त्या त्या राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर संवाज साधून त्या त्या राज्यातील परिस्थिती जाणून घेतली आहे. जाहीर सभांच्या कार्यक्रमांना निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दिल्याने आता प्रचारही जोरदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

पाच राज्यातील येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या गर्दीत सभा होत आहेत, आणि त्या निवडणूक संपेपर्यंत सुरुच राहणार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने जाहिर सभा घेण्याचे दिवस वाढवले असून काही नियमांमध्येही सूट देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जाहिर सभांमध्ये आता 1000 हजार लोकं सहभागी होऊ शकणार आहेत. तर कार्यालयीन बैठकींमध्ये 500 लोकांच्या उपस्थितीला मान्यता देण्यात आली आहे. तर जाहीर प्रचारालाही परवानगी देण्यात आली असून 20 लोकं घराघरात जाऊन प्रचार करु शकणार आहेत. पाच राज्यातील निवडणुकांच्या जाहिर प्रचाराबाबत निवडणूक आयोगाची आज ऑनलाईन बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर ऑनलाईन चर्चा

निवडणूक आयोगाच्या या बैठकीला उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर राज्यातील मुख्य निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित होते. या आधी निवडणूक आयोगाने अशा जाहिर सभांना परवानगी नाकारली होती.

मतदानाचे टप्पे

उत्तर प्रदेशातील 403 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून 10 फेब्रुवारीपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असून 10 फेब्रुवारीला 58 जागांसाठीही पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारीला 55 जागांसाठी तर तिसऱ्या टप्प्यात 20 फेब्रुवारील 59 जागांसाठी, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागांसाठी तर पाचव्या टप्प्यात 27 फेब्रुवारीला 60 जागांसाठी, सहाव्या टप्प्यासाठी 57 तर 3 मार्च रोजी सातव्या टप्प्यासाठी तर 54 जागांसाठी 7 मार्चला मतदान होणार आहे. तर 60 जागांसाठी मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 40 जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी गोवा विधानसभेसाठी मतदान होणार आहे.

संबंधित बातम्या

Wine In Maharashtra : मंदिरात पाण्याऐवजी वाईन द्या, डेअरी बंद करा वायनरी काढा-सदाभाऊ खोत

Aurangabad | महापालिका निवडणूक मनसे ताकदीनं लढणार, पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत निर्णय

भाजप राज्यातच काय देशातही सत्तेत येणार नाही, राऊतांपाठोपाठ पटोलेंनी भाजपला डिवचले

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.