AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांचा मोर्चा पोलिसांनी शंभू सीमेवर अडवला, काही आंदोलक जखमी

शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आंदोलनाची नवी दिशा ठरवली आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा पोलिसांनी रोखल्यानंतर आता शेतकऱ्यांनी नवी योजना जाहीर केली आहे. शेतकरी नेते सर्वनसिंग म्हणाले की, काही शेतकरी जखमी झाल्यामुळे आम्ही आजचा 'जथा' परत बोलावला आहे.

शेतकऱ्यांचा मोर्चा पोलिसांनी शंभू सीमेवर अडवला, काही आंदोलक जखमी
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 06, 2024 | 6:07 PM
Share

शेतकऱ्यांचा मोर्चा पुन्हा एकदा दिल्लीकडे निघाला आहे. आज हा मोर्चा सुरक्षा दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी शंभू सीमेवर अडवला. यावेळी अश्रूधुराच्या नळकांड्या ही फोडल्या. ज्यामुळे काही शेतकरी जखमी झाल्याची बातमी आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी आता हा मोर्चा पुढे ढकलला आहे. दिल्लीकडे पायी निघालेला हा मोर्चा आता रविवारी पुढे निघणार आहे. शेतकरी नेते सर्वनसिंग म्हणाले की, काही शेतकरी जखमी झाल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचा मागे बोलवलं आहे. ते आता परवा परत पुढे जायला निघणार आहेत.

शेतकरी नेते सर्वन सिंग म्हणाले की, हरियाणा पोलिसांच्या एसपींनी आज आम्हाला विचारले होते की तुम्हाला सरकारशी कोणत्या स्तरावर चर्चा करायची आहे. आम्ही त्यांना सांगितले की, आम्ही कोणत्याही केंद्रीय मंत्र्याशी किंवा विशेषत: कृषीमंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहोत. ते म्हणाले की, हरियाणा पोलिसांच्या एसपींनी सांगितले आहे की, केंद्र सरकारला एक दिवसाची वेळ दिली आणि जखमी शेतकऱ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची प्रतीक्षा करण्यासाठी आणि केंद्र सरकारशी चर्चा करण्यासाठी आमचे आंदोलन एक दिवसासाठी स्थगित केले.

हरियाणा पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर शेतकरी नेते सर्वन सिंह म्हणाले की, आम्हाला पोलिसांशी कोणताही संघर्ष नकोय. आम्हाला दिल्लीला जाण्याची परवानगी द्यावी किंवा केंद्र सरकारने आमच्याशी चर्चा करावी. हरियाणा सरकारने आमच्याकडून मागण्या काय आहेत याबाबत पत्र मागितले आहे. आम्ही चर्चेची वाट पाहू. त्यानंतर पुढची रणनीती ठरवू. पंजाबमध्ये आम्ही ठरवलंय की, भाजपचे नेते जिथे जातील तिथे शांततेने निषेध केला जाईल.

आज जवळपास १०० शेतकरी शंभू सीमेवरुन दिल्लीकडे पायी कूच करत असताना हरियाणा पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्समुळे त्यांना काही मीटर अंतरावर रोखण्यात आले. आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. ज्यामुळे अनेक जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरियाणा पोलिसांनी कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Follow Us
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन.
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल.
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन.
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी...
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले.....
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री...
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री....