AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छातीत जळजळ होतेय म्हणून कलिंगड खाल्ले, वडिलांचा मृत्यू, मुलाची तब्येत नाजूक

मुंबईतील पायधुनीत अख्खे कुटुंबच कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता मध्य प्रदेशात तशाच प्रकारची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

छातीत जळजळ होतेय म्हणून कलिंगड खाल्ले, वडिलांचा मृत्यू, मुलाची तब्येत नाजूक
Watermelon Death
| Updated on: May 15, 2026 | 9:58 PM
Share

मुंबईतील पायधुनीत कलिंगड खाल्याने आई-वडील आणि दोन मुलींचा मृत्यू झाल्याचे प्रकरणानंतर मध्य प्रदेशातील श्योपुरमध्ये देखील असाच प्रकार घडला आहे. येथे कलिंगड खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने हडकंप माजला आहे. त्यामुळे बाजारात विकल्या जाणाऱ्या कलिंगडांवर प्रश्न केला जात आहे. लोकांना वाटत आहे की कलिंगडता केमिकल असल्याचा संयश व्यक्त होत आहे. मात्र, मृत्यूचे खरे कारण आता पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतरच कळणार आहे. या घटनेनंतर आरोग्य विभाग आणि प्रशासन सक्रीय झाले असून तपास सुरु करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील सुसनेर येथील निवासी इंद्र कुमार परिहार ( 43 ) हा आपल्या कुटुंबासह श्योपूर येथे पेट्रोल पंपासमोर भाड्याने राहातो. तो पेशाने ड्रायव्हर होता. गुरुवारी रात्री पिता-पुत्राची तब्येत खराब झाली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी इंद्र कुमार आणि त्याचा २१ वर्षीय मुलगा विनोद यांनी कलिंगड खाल्ले. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली.

त्या दोघांना तातडीने श्योपुर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंद्रकुमार यांची तब्येत जास्त खराब झाल्याने त्या कोटा येथे रेफर केले. मात्र, रस्त्यातच त्याचे प्राण गेले. तर मुलगा विनोद याची स्थिती नाजूक आहे. या घटनेनंतर कुटुंबात मातम पसरले. इंद्र सिंह परिहार याच्या पश्चात त्याची पत्नी संगिता, मुलगा विनोद ज्याची तब्येत नाजूक बनलेली आहे. या कुटुंबात महिला सदस्य राधिका देखील त्यांच्यासोबत राहाते.

घटनेची सूचना मिळताच कुटुंब इंद्र कुमार परिहार याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी इटावा येथे गेले आहे. या मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. जिल्हा हॉस्पिटलचे सिव्हील सर्जन डॉ. आरबी गोयल यांनी सांगितले की दोन लोकांना सकाळी गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. कलिंगडने मृत्यू झाला असे म्हणता येणे शक्य नाही. पोटात इन्फेक्शन झालेले असू शकते. डॉक्टर या तपासणी करत असून नंतरचे नेमके कारण कळू शकेल असे म्हटले जात आहे.

गेल्या वर्षीही कलिंगड खाल्ल्याने एकाचा मृत्यू

तर कुटुंबियांनी सांगितले की या कुटुंबाने खातौली तिराहा येथून गुरुवारी सायंकाळी कलिंगड खरेदी केले होते. कुलरमध्ये थंड होण्यासाठी ठेवले होते, नंतर ते खाल्ले. मध्य प्रदेशात गेल्या वर्षीही कलिंगड खाल्ल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना छिंदवाडा येथे घडली होती. येथील बडी माता मंदिराच्या जवळ राहणाऱ्या २७ वर्षीय सिद्धार्थ ताम्रकार यांचा मृत्यू झाला होता. सिद्धार्थ याने दुपारी जेवणानंतर कलिंगड खाल्ले आणि नंतर तो झोपला. जेव्हा तो उठला नाही तेव्हा कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात नेले तेव्हा त्याला मृत घोषीत केले.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?