छातीत जळजळ होतेय म्हणून कलिंगड खाल्ले, वडिलांचा मृत्यू, मुलाची तब्येत नाजूक
मुंबईतील पायधुनीत अख्खे कुटुंबच कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता मध्य प्रदेशात तशाच प्रकारची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबईतील पायधुनीत कलिंगड खाल्याने आई-वडील आणि दोन मुलींचा मृत्यू झाल्याचे प्रकरणानंतर मध्य प्रदेशातील श्योपुरमध्ये देखील असाच प्रकार घडला आहे. येथे कलिंगड खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने हडकंप माजला आहे. त्यामुळे बाजारात विकल्या जाणाऱ्या कलिंगडांवर प्रश्न केला जात आहे. लोकांना वाटत आहे की कलिंगडता केमिकल असल्याचा संयश व्यक्त होत आहे. मात्र, मृत्यूचे खरे कारण आता पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतरच कळणार आहे. या घटनेनंतर आरोग्य विभाग आणि प्रशासन सक्रीय झाले असून तपास सुरु करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील सुसनेर येथील निवासी इंद्र कुमार परिहार ( 43 ) हा आपल्या कुटुंबासह श्योपूर येथे पेट्रोल पंपासमोर भाड्याने राहातो. तो पेशाने ड्रायव्हर होता. गुरुवारी रात्री पिता-पुत्राची तब्येत खराब झाली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी इंद्र कुमार आणि त्याचा २१ वर्षीय मुलगा विनोद यांनी कलिंगड खाल्ले. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली.
त्या दोघांना तातडीने श्योपुर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंद्रकुमार यांची तब्येत जास्त खराब झाल्याने त्या कोटा येथे रेफर केले. मात्र, रस्त्यातच त्याचे प्राण गेले. तर मुलगा विनोद याची स्थिती नाजूक आहे. या घटनेनंतर कुटुंबात मातम पसरले. इंद्र सिंह परिहार याच्या पश्चात त्याची पत्नी संगिता, मुलगा विनोद ज्याची तब्येत नाजूक बनलेली आहे. या कुटुंबात महिला सदस्य राधिका देखील त्यांच्यासोबत राहाते.
घटनेची सूचना मिळताच कुटुंब इंद्र कुमार परिहार याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी इटावा येथे गेले आहे. या मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. जिल्हा हॉस्पिटलचे सिव्हील सर्जन डॉ. आरबी गोयल यांनी सांगितले की दोन लोकांना सकाळी गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. कलिंगडने मृत्यू झाला असे म्हणता येणे शक्य नाही. पोटात इन्फेक्शन झालेले असू शकते. डॉक्टर या तपासणी करत असून नंतरचे नेमके कारण कळू शकेल असे म्हटले जात आहे.
गेल्या वर्षीही कलिंगड खाल्ल्याने एकाचा मृत्यू
तर कुटुंबियांनी सांगितले की या कुटुंबाने खातौली तिराहा येथून गुरुवारी सायंकाळी कलिंगड खरेदी केले होते. कुलरमध्ये थंड होण्यासाठी ठेवले होते, नंतर ते खाल्ले. मध्य प्रदेशात गेल्या वर्षीही कलिंगड खाल्ल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना छिंदवाडा येथे घडली होती. येथील बडी माता मंदिराच्या जवळ राहणाऱ्या २७ वर्षीय सिद्धार्थ ताम्रकार यांचा मृत्यू झाला होता. सिद्धार्थ याने दुपारी जेवणानंतर कलिंगड खाल्ले आणि नंतर तो झोपला. जेव्हा तो उठला नाही तेव्हा कुटुंबियांनी त्याला रुग्णालयात नेले तेव्हा त्याला मृत घोषीत केले.
