AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोग्य क्षेत्राला हवा वाढीव निधी, केंद्राचं उत्तर; ..ही तर राज्यांची जबाबदारी!

अर्थ सचिव टी. व्ही. सोमनाथन (TV Somanathan) यांनी आरोग्य सेवा क्षेत्र (Healthcare Sector) हा राज्यांच्या जबाबदारीचा विषय असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आरोग्य बजेटवरुन केंद्र व राज्यांत वादाचा नवा अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

आरोग्य क्षेत्राला हवा वाढीव निधी, केंद्राचं उत्तर; ..ही तर राज्यांची जबाबदारी!
मधुमेहाच्या रुग्णांनी जिऱ्याचे पाणी पिण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिऱ्याचे सेवन केले जात असले तरी त्याचे जास्त सेवन केल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.
| Edited By: | Updated on: Feb 21, 2022 | 6:04 PM
Share

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थसंकल्पात (UNION BUDGET) आरोग्य क्षेत्रासाठी पुरेशी तरतूद नसल्याच्या मुद्द्यावर केंद्राची भूमिका समोर आली आहे. अर्थ सचिव टी. व्ही. सोमनाथन (TV Somanathan) यांनी आरोग्य सेवा क्षेत्र (Healthcare Sector) हा राज्यांच्या जबाबदारीचा विषय असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आरोग्य बजेटवरुन केंद्र व राज्यांत वादाचा नवा अंक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्प सादरीकरण केल्यानंतर आरोग्य सेवा क्षेत्राच्या निधीबाबत आरोग्य क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात होती. केंद्र सरकार आरोग्य पायाभूत सुविधा उभारण्यावर निधी खर्च करत आहे. जीडीपीच्या 1.3 टक्के पैसे आरोग्य क्षेत्रासाठी वर्ग करण्यात आले आल्याचं सोमनाथ यांनी सांगितले. दुर्बल आर्थिक घटकातील नागरिकांना लाभ व्हावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सरकारने हाती घेतल्याचे सोमनाथ यांनी म्हटलं आहे.

जीडीपीच्या 3 टक्के:

आर्थिक वर्ष 2022-23 अर्थसंकल्पानुसार, सरकार आरोग्य सेवा क्षेत्रावर 83,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत समान रक्कम आहे. मात्र, कोविडचा प्रकोप अद्याप कायम असल्याने आरोग्य क्षेत्रासाठी अधिक निधीची मागणी समोर येत आहे. भारतीय उद्योग महासंघाने अर्थसंकल्पावर उद्योजक-अधिकाऱ्यांचं चर्चासत्र आयोजित केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह बडे अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी सीआयआयचे अध्यक्ष टी.व्ही.नरेंद्र यांनी आरोग्यावर जीडीपीच्या तीन टक्के खर्च करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.

आरोग्य क्षेत्राचं खासगीकरण?

अर्थ सचिवांनी आरोग्य क्षेत्राच्या प्रश्नांवर आकडेवारीचा दाखला दिला. कोविड प्रकोपाच्या काळात थकित कर्जाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. सर्व क्षेत्रांसाठी सरकारने योजना हाती घेतली होती. यामध्ये आरोग्य क्षेत्राला देखील मोठ्या प्रमाणात योजनेमधून आर्थिक लाभ मिळवून देण्यात आल्याचे अर्थ सचिवांनी म्हटलं आहे. खासगी क्षेत्रांनी आरोग्याच्या क्षेत्रात लक्ष घालण्याचं आवाहन वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं आहे.

डिजिटल इकोसिस्टम:

अर्थमंत्री निर्मला सीतारमन केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला होता. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा चौथा अर्थसंकल्प ठरला होता. अर्थमंत्री सीतारमन नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टमसाठी खुले व्यासपीठ सुरू केले जाईल अशी घोषणा केली होती. आरोग्य पुरवठादार आणि आरोग्य सुविधांसाठी डिजिटल नोंदणीचा समावेश असेल.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.