AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भारतीय मुस्लिमांच्या हातात फक्त 15 मिनिटे सत्ता द्या, मग…’, ओवैसीच्या पक्षातील बड्या नेत्याने नेमके काय म्हटले?

देशाच्या उभारणीत आणि प्रगतीत मुस्लिमांनी एक मजबूत भूमिका बजावली आहे. मुस्लीम समाजाची ही भूमिका विसरता येणार नाही. ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीचे जमई यांनी कौतुक केले. तसेच या मोहिमेशी संबंधित माहिती माध्यमांना देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचेही स्तुती केली.

'भारतीय मुस्लिमांच्या हातात फक्त 15 मिनिटे सत्ता द्या, मग...', ओवैसीच्या पक्षातील बड्या नेत्याने नेमके काय म्हटले?
Shoaib Jamai
| Updated on: May 09, 2025 | 9:15 AM
Share

India Strikes in Pakistan: भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु केले आहे. हे ऑपरेशन संपले नसल्याचे भारताने स्पष्ट केले. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे. या कारवाईनंतर पाकिस्तानमधून चालणारा दहशतवाद मुळासकट संपवण्याची मागणी होत आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजे एआयएमआयएमच्या नेत्याने मोठी मागणी केली आहे.

मुस्लिमांकडे फक्त 15 मिनिटे सत्ता द्या

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष शोएब जमई यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे. त्याचा वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारताच्या मुस्लिमांकडे फक्त 15 मिनिटे सत्ता द्या. त्यानंतर पाकिस्तानला कसे नष्ट करु, हे आम्ही दाखवून देऊ. भारतातील मुस्लिमांनी ‘द्विराष्ट्र सिद्धांत’ आधीच नाकारला असल्याचे शोएब जमई यांनी सांगितले.

शोएब जमई म्हणाले, देशाच्या उभारणीत आणि प्रगतीत मुस्लिमांनी एक मजबूत भूमिका बजावली आहे. मुस्लीम समाजाची ही भूमिका विसरता येणार नाही. ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीचे जमई यांनी कौतुक केले. तसेच या मोहिमेशी संबंधित माहिती माध्यमांना देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचेही स्तुती केली.

एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही ऑपरेशन सिंदूरचे कौतूक केले. नुकतेच एका सार्वजनीक सभेत ओवैसी यांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ आणि ‘हिंदुस्तान जिंदाबाद’ या घोषणा दिल्या होत्या. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून सातत्याने करण्यात येत होती. देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करु नये. तसेच या प्रसंगी आपण सर्व एक आहोत, हे दाखवून देऊ. ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानसाठी एक संदेश आहे. या माध्यमातून भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या ह्रदयात असलेले अथांग प्रेम दिसत आहे, असे ओवैसी यांनी म्हटले.

भारताने पाकिस्तामधील दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवली. या मोहिमेत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची नऊ तळ उद्धवस्त करण्यात आली. भारताच्या या कारवाईचा धसका पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी घेतला आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....