AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मटण-चिकन काय अंडीही मिळत नाहीत, हे आहे जगातले पहिले शाकाहारी शहर

काही समुदायांनी या नॉनव्हेज बंदीमुळे नाराजी देखील व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे पर्यटकांवर देखील परिणाम होणार असल्याचे म्हटले जात आहे.

मटण-चिकन काय अंडीही मिळत नाहीत, हे आहे जगातले पहिले शाकाहारी शहर
| Updated on: Nov 08, 2025 | 10:51 PM
Share

जगात मासांहारी खाणाऱ्या पेक्षा आता शाकाहारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. शाकाहारी जेवण शरीरास अधिक मानवते. कोरोना काळापासून लोकांचा कल शाकाहाराकडे चालला आहे. आरोग्याच्या दृष्टीने मासांहारा पेक्षा शाकाहार केव्हाही चांगलाच असल्याचे म्हटले जाते. अशात आता भारतातील एक शहर जगातले पहिले शाकाहारी शहर म्हणून घोषीत झाले आहे. कोणते हे शहर आहे हे पाहूयात…

गुजरात येथील पालीताना या शहरात नॉन व्हेज वर संपूर्णपणे बंदी घातली आहे. भावनगर जिल्ह्यातील पालीताना येथे आता केवळ शुद्ध शाकाहारी जेवण मिळणार आहे. पालीताना जगातले पहिले शाकाहारी शहर बनले आहे. येथे आता केवळ शाकाहारी पदार्थ मिळतील असे म्हटले जात आहे.

हा निर्णय जैन मुनींनी केलेल्या विरोधानंतर घेण्यात आला आहे. नॉन व्हेज भोजनावर संपूर्ण प्रतिबंध केल्यामुळे हे शहर जगभरात चर्चेत आले आहे.पालिताना शहर जैन धर्मियांचे एक तिर्थस्थान आहे. देश आणि जगभरातील जैन धर्माच्या लोकांसाठी हे एक महत्वाचे पवित्र स्थळ आहे. या निर्णयामागे येथील धार्मिक श्रद्धा महत्वाची मानली जात आहे.

जैन मुनींचा प्रदीर्घ संघर्ष

पालीताना गुजरातच्या अहमदाबाद पासून ३८१ किमीवर आहे. येथे रस्ते मार्गे येण्यासाठी किमान सात तास लागतात. जैन धर्माचे तिर्थस्थान असलेल्या या शहरात नॉन व्हेजवर बंदी घालण्यासाठी तर २०१४ पासून सुमारे २०० मुनींनी २५० तासांचे उपोषण केले होते. यात कत्तलखान्यांना बंद करण्याची मागणी होती. जैन धर्मियांच्या श्रद्धेचा सन्मान करण्यासाठी सरकारने मांस,अंडी विक्री आणि पशुवधावर प्रतिबंध घातला. एवढेच नाही तर नियम तोडल्यावर दंडाची तरतूद केली. सरकारचा हा निर्णय जैन धर्मियांचा मोठा विजय मानला जातो.

नॉनव्हेज बंदीमुळे पालीताना येथे अनेक शाकाहारी रेस्टॉरंट उघडण्यात आले आहेत. येथे विविध शाकाहारी पदार्थांना वाढले जाते. भावनगरच्या पालीताना शहरावर भाजपाचे राज्य आहे. २००२ मध्ये पालीताना विधानसभा क्षेत्र बनले. येथे २०१२ चा अपवाद वगळता भाजपाचा विजय झाला आहे. या जागेवरुन निवडून आलेले आमदार केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया झाले आहेत. ते २००२ पासून येथे विजयी होत आले आहेत. पालिताना येथील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथील जैन धर्माचे सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या शत्रुंजय पर्वतावर असलेले ९०० हून अधिक संगमरवरी मंदिरांचा जगातील सर्वात मोठे आणि अनोखा परिसर होय.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.