AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मटण-चिकन काय अंडीही मिळत नाहीत, हे आहे जगातले पहिले शाकाहारी शहर

काही समुदायांनी या नॉनव्हेज बंदीमुळे नाराजी देखील व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे पर्यटकांवर देखील परिणाम होणार असल्याचे म्हटले जात आहे.

मटण-चिकन काय अंडीही मिळत नाहीत, हे आहे जगातले पहिले शाकाहारी शहर
| Updated on: Nov 08, 2025 | 10:51 PM
Share

जगात मासांहारी खाणाऱ्या पेक्षा आता शाकाहारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. शाकाहारी जेवण शरीरास अधिक मानवते. कोरोना काळापासून लोकांचा कल शाकाहाराकडे चालला आहे. आरोग्याच्या दृष्टीने मासांहारा पेक्षा शाकाहार केव्हाही चांगलाच असल्याचे म्हटले जाते. अशात आता भारतातील एक शहर जगातले पहिले शाकाहारी शहर म्हणून घोषीत झाले आहे. कोणते हे शहर आहे हे पाहूयात…

गुजरात येथील पालीताना या शहरात नॉन व्हेज वर संपूर्णपणे बंदी घातली आहे. भावनगर जिल्ह्यातील पालीताना येथे आता केवळ शुद्ध शाकाहारी जेवण मिळणार आहे. पालीताना जगातले पहिले शाकाहारी शहर बनले आहे. येथे आता केवळ शाकाहारी पदार्थ मिळतील असे म्हटले जात आहे.

हा निर्णय जैन मुनींनी केलेल्या विरोधानंतर घेण्यात आला आहे. नॉन व्हेज भोजनावर संपूर्ण प्रतिबंध केल्यामुळे हे शहर जगभरात चर्चेत आले आहे.पालिताना शहर जैन धर्मियांचे एक तिर्थस्थान आहे. देश आणि जगभरातील जैन धर्माच्या लोकांसाठी हे एक महत्वाचे पवित्र स्थळ आहे. या निर्णयामागे येथील धार्मिक श्रद्धा महत्वाची मानली जात आहे.

जैन मुनींचा प्रदीर्घ संघर्ष

पालीताना गुजरातच्या अहमदाबाद पासून ३८१ किमीवर आहे. येथे रस्ते मार्गे येण्यासाठी किमान सात तास लागतात. जैन धर्माचे तिर्थस्थान असलेल्या या शहरात नॉन व्हेजवर बंदी घालण्यासाठी तर २०१४ पासून सुमारे २०० मुनींनी २५० तासांचे उपोषण केले होते. यात कत्तलखान्यांना बंद करण्याची मागणी होती. जैन धर्मियांच्या श्रद्धेचा सन्मान करण्यासाठी सरकारने मांस,अंडी विक्री आणि पशुवधावर प्रतिबंध घातला. एवढेच नाही तर नियम तोडल्यावर दंडाची तरतूद केली. सरकारचा हा निर्णय जैन धर्मियांचा मोठा विजय मानला जातो.

नॉनव्हेज बंदीमुळे पालीताना येथे अनेक शाकाहारी रेस्टॉरंट उघडण्यात आले आहेत. येथे विविध शाकाहारी पदार्थांना वाढले जाते. भावनगरच्या पालीताना शहरावर भाजपाचे राज्य आहे. २००२ मध्ये पालीताना विधानसभा क्षेत्र बनले. येथे २०१२ चा अपवाद वगळता भाजपाचा विजय झाला आहे. या जागेवरुन निवडून आलेले आमदार केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया झाले आहेत. ते २००२ पासून येथे विजयी होत आले आहेत. पालिताना येथील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथील जैन धर्माचे सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या शत्रुंजय पर्वतावर असलेले ९०० हून अधिक संगमरवरी मंदिरांचा जगातील सर्वात मोठे आणि अनोखा परिसर होय.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?.

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप