AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : या राज्यातील 31 जिल्ह्यांमध्ये 5 मे पर्यंत यलो अलर्ट जारी, बर्फवृष्टी झाल्याने लोकं म्हणाले…

Weather Update : काल अनेकांना व्हिडीओ आणि फोटो पाहिल्यानंतर राजस्थान राज्यात बर्फवृष्टी पाहायला मिळाली. अवकाळी पावसामुळे राज्यातील तापमान नऊ अंशांनी कमी झाले आहे.

Weather Update : या राज्यातील 31 जिल्ह्यांमध्ये  5 मे पर्यंत यलो अलर्ट जारी, बर्फवृष्टी झाल्याने लोकं म्हणाले...
Weather UpdateImage Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 30, 2023 | 8:01 AM
Share

मुंबई : देशात हवामान (Weather Update) बदलाचा परिणाम अनेकांनी ठिकाणी पाहायला मिळत आहे. काल राजस्थान (Rajsthan Climate Change) राज्यात अवकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणचं तापमान नऊ अंशांनी सामान्यपेक्षा कमी झाल्याची नोंद झाली आहे. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे नागौरच्या देह, रोल, तरनाळ या भागात मुसळधार पाऊस (Today heavy Rain Update) झाला आहे. सगळीकडे गारा पडल्या असल्यामुळे काश्मीर सारखं चित्र तिथल्या रहिवाशांना पाहायला मिळालं. शेतात गारांचा जोरात मारा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे काश्मीर भागात ज्या पद्धतीने बर्फवृष्टी होते, तसंच दृष्ट पाहायला मिळाल्याचं अनेकांनी सोशल मीडियावर सांगितलं आहे.

मांगलोद गावात राहणाऱ्या रामेश्वर दंतुससिया यांनी सांगितले की, काल झालेल्या वादळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे अनेकांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे घरावरील छप्पर उडून गेले आहे, एवढं मोठं वादळ झालं आहे की, परिसरातील पशु-पक्षी सुध्दा जखमी झाले आहेत. तिथले शिक्षक गोपाल छाबा यांनी सांगितले की, ज्यावेळी ते शाळेतून त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी मंगलोडजवळील पिडियारा परिसरात जोरदार गारपीट झाली. राजस्थानमधील 31 जिल्ह्यांमध्ये 5 मे पर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राजस्थान राज्यातील हवामान खात्याने आज सुद्धा अनेक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राजस्थानमध्ये उत्तर आणि पूर्व भागात उद्या मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. 2 मे पासून आणखी एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्याने, 2-3 मे रोजी पुन्हा एकदा नवा वादळाची शक्यता आहे.

यावर्षी उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात अनेक राज्यात पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.